Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Courses After SSC : दहावीनंतर काय करावे? ही घ्या तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती

Courses After SSC : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. या निकालानंतर काय करावे? कोणत्या अभ्यासक्रमाला जाता येईल, नवीन संधी कोणत्या आहेत, याची माहिती जाणून घ्या...

Courses After SSC  : दहावीनंतर काय करावे? ही घ्या तुम्हाला हवी असणारी सर्व माहिती
Student
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 9:25 AM

पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. दहावी बोर्डाचा निकाल मागील वर्षापेक्षा कमी लागला आहे. राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.87% लागला आहे. तर मुलांचा निकाल 92.5% लागला आहे. आता निकालानंतर काय करता येणार, कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, ही सर्व माहिती एका चार्टमधून तुम्हाला मिळणार आहे.

राज्यात 15 लाख 29 हजार 96 इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती.

कोणती अभ्यासक्रम आहेत उपलब्ध

हे सुद्धा वाचा

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांना प्रवेश घेता येईल. तसेच पारंपारिक विद्याशाखांसोबत वेगळी वाटही निवडता येईल. अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेश घेऊन पुढे बीईसुद्धा करता येईल. आयटीआय शाखेला प्रवेश घेऊन कौशल्य विकासासंदर्भात रोजगार मिळवता येईल. तसेच स्वत:चा छोटा उद्योगही सुरु करता येणार आहे.

बारावीनंतर अनेक संधी

विद्यार्थ्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण वाणिज्या शाखेतून घेतल्यानंतर पुढं देखील वाणिज्य शाखेची निवड करणं त्यांच्या करिअरसाठी महत्वाचं ठरु शकतं. बारावीनंतर विद्यार्थी फायनान्स, अकाऊंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटींग, गुंतवणूक क्षेत्र, विमा क्षेत्र, बँक असं मोठं क्षेत्र वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं आहे.

भारतात गेल्या काही वर्षांपासून पर्यटन आणि हॉस्पिटलिटीसह हॉटेल इंडस्ट्री वाढत आहे. यामुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटलटी क्षेत्र सातत्यानं वाढत असल्यानं या क्षेत्रात करिअरच्या चागंल्या पगाराच्या संधी निर्माण होत आहेत. देश सेवेसाठी इच्छूक असणारे तरुण 12 वी किंवा ग्रॅज्युएशननंतर सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करु शकतात, असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

यंदा नागपूरचा सर्वाधिक कमी निकाल

मार्चमध्ये इयत्ता दहावीची परीक्षा पार पडली होती. या परीक्षेला 15 लाख 29 हजार 96 विद्यार्थी बसले होते. त्यातील 14 लाख 34 हजार 898 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता दहावीच्या निकालात नागपूर विभागाचा सर्वात कमी म्हणजे 92.49 टक्के निकाल लागला आहे. तर कोकण विभागाने 98.11 टक्के निकाल लागला आहे.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.