Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निम्रतसोबत अफेअरच्या चर्चांवर अभिषेक का गप्प? बच्चन कुटुंबीय नाराज, करणार कायदेशीर कारवाई

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. निम्रतसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अभिषेकने अद्याप मौन का बाळगलंय, असा प्रश्न चाहत्यांकडून केला जात होता.

निम्रतसोबत अफेअरच्या चर्चांवर अभिषेक का गप्प? बच्चन कुटुंबीय नाराज, करणार कायदेशीर कारवाई
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 07, 2025 | 3:42 PM

अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. या चर्चांवर अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अभिषेकचं नाव आता अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता बच्चन कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व गोष्टींचा बच्चन कुटुंबीयांवर काय परिणाम होतोय, याविषयी त्याने सांगितलं आहे. बच्चन कुटुंबाच्या या जवळच्या व्यक्तीने ‘टाइम्स नाऊ’ला मुलाखत दिली असून त्यात त्याने निम्रतसोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे. निम्रत आणि अभिषेकच्या नात्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय.

अभिषेक सध्या त्याच्या खासगी आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा सामना करत असल्याने त्याने कोणत्याही वादात अडकू नये असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. म्हणूनच तो निम्रत प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये. “या अफवांमध्ये कणभरही तथ्य नाही. आम्हाला आश्चर्य वाटतंय की त्या महिलेनं अद्याप या चर्चांना नाकारलं का नाही? अभिषेक मौन बाळगून आहे कारण त्याच्या खासगी आयुष्यात आधीच खूप समस्या आहेत. त्याला कोणत्याही नव्या वादात न अडकण्याचा सल्ला देण्यात आला आहे”, असं ती व्यक्ती म्हणाली.

हे सुद्धा वाचा

बच्चन कुटुंबाच्या या जवळच्या व्यक्तीने असंही म्हटलंय की अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक कधीच करणार नाही. अभिषेक त्याच्या नात्यात नेहमीच प्रामाणिक राहिला आहे. त्यामुळे सध्या ज्या काही चर्चा होत आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. “ही अफेअरची चर्चा कधी आणि कुठून सुरू झाली? अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक करणाऱ्यांपैकी नाही. तो पूर्पणे प्रामाणिक आहे. अभिषेकच्या वैवाहिक आयुष्यात आधीच वादळ आलं असताना तो असं का करेल”, असा प्रतिप्रश्न संबंधित व्यक्तीने केला. या अफवांमुळे बच्चन कुटुंबीय खूप नाराज असल्याचंही त्याने म्हटलंय.

“ज्यांनी जया बच्चन यांच्या आईच्या निधनाची अफवा पसरवली आहे, त्यांचाही शोध लावला जाईल. जया बच्चन यामुळे प्रचंड रागात आहेत. ही अफवा कोणी पसरवली याचा ते शोध घेत आहेत. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल”, असंही त्यांनी म्हटलंय.

निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.