Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना आता अभिषेकनेच दिली हवा

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर अशी एक पोस्ट लाईक केली आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही पोस्ट घटस्फोटाशी संंबंधित होती. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडपे घटस्फोटाला कसे सामोरे जातात, याविषयीचा हा लेख होता.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना आता अभिषेकनेच दिली हवा
ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 9:52 AM

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. मात्र त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या एण्ट्रीनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित आहे. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट आता अभिषेकने लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. वृद्ध जोडप्यांना हात धरून रस्ता ओलांडतानाचे व्हिडीओ पाहून ते क्षण आपणसुद्धा कधीतरी अनुभवावेत असं कोणाला वाटत नाही किंवा ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ची (आयुष्यभर आनंदाने जगावं) स्वप्नं कोण पाहत नाहीत? तरीसुद्धा आयुष्य कधीकधी आपल्या अपेक्षेप्रमाणे उलगडत नाही. पण अनेक दशकं एकत्र राहिल्यानंतर, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनल्यानंतर आणि अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी एकत्र अनुभवल्यानंतर, एकमेकांवर बराच काळ अवलंबून राहिल्यानंतर लोक घटस्फोटाचा सामना कसा करतात?’ अभिषेकने हीच पोस्ट लाईक केली आहे.

हे सुद्धा वाचा

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले होते. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या.

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.