“माझ्या खासगी आयुष्याबद्दल..”; अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्यचं वक्तव्य चर्चेत

मे महिन्यात अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी व्यक्त झाला.

माझ्या खासगी आयुष्याबद्दल..; अनन्या पांडेसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्यचं वक्तव्य चर्चेत
Aditya Roy Kapur and Ananya PandayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 1:40 PM

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलणं का टाळतो, याचं उत्तर दिलं आहे. अनन्या आणि आदित्य हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर परदेशात जेव्हा दोघं फिरायला गेले होते, तेव्हा तिथलेही काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आदित्य कधीच त्याच्या नात्याविषयी माध्यमांसमोर मोकळेपणे व्यक्त झाला नाही. यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

‘लाइफस्टाइल आशिया इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या मते मी माझ्या खासगी आयुष्याविषयी नेहमीच गप्प राहिलो. मला तसंच राहायला आवडतं. लोकांनी माझ्याबद्दल किंवा माझ्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यावं, अशी कधी मला गरजच वाटली नाही. म्हणूनच मी काही गोष्टी माझ्यापुरत्याच ठेवतो. मला सर्वकाही व्यक्त केलेलं आवडत नाही. मला ज्या फालतू गोष्टींची गरज नाही, त्यात मी माझा वेळ का वाया घालवू? त्याने माझा काहीच फायदा होणार नाही. हल्ली लोकांना प्रत्येक गोष्टीविषयी आपलं मत मांडायचं असतं. आपण मत मांडणं खूप गरजेचं आहे, असं त्यांना वाटतं. त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी काही ना काही बोलायचं असतं.”

हे सुद्धा वाचा

आदित्य रॉय कपूरचा चाहतावर्ग मोठा असला तरी सोशल मीडियावर तो फारसा सक्रिय नसतो. फक्त त्याच्या चित्रपट आणि जाहिरातींविषयीचे पोस्ट तो शेअर करत असतो. “माझ्या मते मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसल्याने लोक माझ्याबद्दल काय म्हणत असतील याने मला काही फरक पडत नाही. समाजात असे अनेक लोक असतात, ज्यांना तुम्ही आवडता किंवा आवडत नाहीत. त्यामुळे तो प्रत्येकजण काय म्हणतोय, याकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे माझ्या पोस्टवर लोक काय कमेंट करतात, हेसुद्धा मी पाहत नाही.”

गेल्या वर्षी अनन्या पांडेनं जेव्हा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती, तेव्हा तिने अप्रत्यक्षपणे आदित्यसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. अनन्या आणि आदित्य 2022 पासून एकमेकांना डेट करत होते. यावर्षी मे महिन्यात दोघांनी ब्रेकअप केल्याची चर्चा आहे. या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान आदित्यला अभिनेत्री सारा अली खानसोबत एका पार्टीमध्ये पाहिलं गेलं.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.