Haryana Violence | ‘कुटुंबीयांच्या रक्षणासाठी मुस्लिमांनी हिंदू धर्म स्वीकारावा..’; हरियाणातील हिंसाचारावर अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

हरियाणामधील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा हिंसाचार म्हणजे व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला.

Haryana Violence | 'कुटुंबीयांच्या रक्षणासाठी मुस्लिमांनी हिंदू धर्म स्वीकारावा..'; हरियाणातील हिंसाचारावर अभिनेत्याचं ट्विट चर्चेत
Haryana Gurugram ViolenceImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:00 AM

मुंबई | 4 ऑगस्ट 2023 : हरियाणामध्ये गुरुवारी सलग चौथ्या दिवशी तणाव कायम होता. गुरुग्राममध्ये बुधवारी संध्याकाळी 25 ते 30 जणांच्या जमावाने दोन बंगाली मुस्लीम स्थलांतरितांना मारहाण केल्याची घटना समोर आली. तर नुह इथं एका मशिदीला आग लावण्यात आली. या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 176 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच गुरुवारपर्यंत 93 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. हरियाणामधील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तर सुरूच आहेत. मात्र त्याचसोबत कलाविश्वातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यादरम्यान एका अभिनेत्याने केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे. या अभिनेत्याने मुस्लीम समुदायाला सल्ला दिला आहे.

‘मी भारतातील सर्व मुस्लिमांना सुचवू इच्छितो की धर्मांतर करून हिंदू बनणं हा चांगला पर्याय आहे, कारण धर्मापेक्षा आपल्या कुटुंबीयांचा आणि मुलांचा जीव अधिक महत्त्वाचा आहे. आपण भारतीय मुस्लिमांनी अरबांसाठी धर्मांतर केलं आणि आता अरब देश इस्लामचं रक्षण करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे आपलं कुटुंब वाचवण्यासाठी पुन्हा धर्मांतर करण्यात काहीच गैर नाही’, असं ट्विट या अभिनेत्याने केलं आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे.

हे सुद्धा वाचा

आणखी एका ट्विटमध्ये केआरकेनं पुढे लिहिलंय, ‘मी फक्त इतकंच म्हणतोय की भारतीय मुस्लिमांनी अरबांना का फॉलो करावं, जेव्हा ते त्यांच्या समर्थनासाठी एक शब्दही बोलू शकत नाहीत. जर आखाती देशांना हवं असले तर भारत सरकार 24 तासांत सर्वकाही थांबवेल. सुमारे 5 दशलक्ष हिंदू आखाती देशांमध्ये राहतात आणि अदानी, माल्या, सहारा यांच्यासारखे मोठे लोक राहतात.’

केआरकेच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘तुम्ही भारतीय आहात, धर्माचा विषय नंतर येतो. माणुसकी आणि बंधुभाव महत्त्वाचा आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आम्ही फक्त अल्लाहकडून मदत मागतो’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. हरियाणामधील हिंसाचारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हा हिंसाचार म्हणजे व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला. जमायत उलेमा-ए-हिंद या संघटनेनं महाराष्ट्रात सोमवारी रेल्वेमध्ये घडलेलं हत्याकांड आणि हरियाणा हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंचा भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम-हम पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.