Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिला स्टेजवर पाहिल्यानंतर सलमान खान आनंदी, चाहते म्हणाले, ‘प्रेम तर खरं होतं…’

Aishwarya Rai Bachchan - Salman Khan : 'प्रेम तर खरं होतं...', ऐश्वर्या राय हिला पाहिल्यानंतर खास असतात सलमना खान याच्या भावना... 'तो' व्हिडीओ पाहून तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान - ऐश्वर्या यांच्या व्हिडीओची चर्चा...

ऐश्वर्या राय हिला स्टेजवर पाहिल्यानंतर सलमान खान आनंदी, चाहते म्हणाले, 'प्रेम तर खरं होतं...'
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 10:58 AM

मुंबई | 31 जानेवारी 2024 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सलमान – ऐश्वर्या बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय सेलिब्रिटी तर आहेतच पण खासगी आयुष्यामुळे दोघे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा होती. ‘हम दिल दे चूके सनम’ सिनेमानंतर दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नाव लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आजही त्यांच्या नात्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते.

सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना असला तरी, चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या हिला स्टेजवर परफॉर्म करताना पाहून सलमान खान याच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद पाहून चाहत्यां देखील दोघांच्या नात्याची आठवण झाली.

हे सुद्धा वाचा

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री स्टेजवर ‘डोला रे डोला’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान देखील दिसत आहे. सलमान एक टक ऐश्वर्या हिच्याकडे पाहाताना दिसत आहे. ऐश्वर्या हिचा परफॉर्मेन्स संपल्यानंतर सलमान खान जोर-जोरात टाळ्या वाजवताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान – ऐश्वर्या यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सलमान – ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्या हिने आराध्या हिला जन्म दिला. पण सलमान खान पुढे जाऊच शकला नाही…’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘प्रेम तर खरं होतं…’ नेटकरी कमेंट करत सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

ऐश्वर्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. पण सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याचा अंत फार वाईट होता. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं..

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर ऐश्वर्या हिने 2011 मध्ये लेक आराध्या हिली जन्म दिला. अभिनेत्रीच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली होती. ऐश्वर्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसते. अभिनेत्री कोणताही सिनेमा साईन करण्याआधी विचार करते.

VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.