प्रेम, साखरपुडा त्यानंतर फसवणूक; 19 वर्षांनंतर आमने – सामने येणार अक्षय – रवीना यांची जोडी

Akshay Kumar | ब्रेकअपच्या तब्बल १९ वर्षांनंतर अक्षय - रवीना यांची जोडी येणार आमने - सामने, कारण..., सध्या सर्वत्र अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन यांच्या नात्याची चर्चा...

प्रेम, साखरपुडा त्यानंतर फसवणूक; 19 वर्षांनंतर आमने - सामने येणार अक्षय - रवीना यांची जोडी
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 1:18 PM

मुंबई : 9 सप्टेंबर 2023 | झगमगत्या विश्वातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी चाहत्यांसमोर येत असतात. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जेव्हा सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, रिलेशनशिपमुळे चर्चेत असायचे. पण अनेक सेलिब्रिटींचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर सेलिब्रिटींनी एकमेकांचं तोंड देखील पाहिलं नाही. पण अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन ब्रेकअपच्या तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. ९० च्या दशकात दोघांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण ब्रेकअपनंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाही. पण अभिनेत्याने वाढदिवसाच्या निमित्त एक मोठी घोषणा केली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने अक्षय कुमार याने ‘वेलकम ३’ सिनेमाची घोषणा केली आहे. त्यामुळे ‘वेलकम ३’ सिनेमाबाबतची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र ‘वेलकम ३’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमात रवीना टंडन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तब्बल १९ वर्षांनंतर दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार याने सिनेमाचा एक पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पोस्टरमध्ये अक्षय आणि रवीना यांच्यासोबत अन्य प्रसिद्ध सेलिब्रिटी दिसत आहेत. पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन स्टारर ‘वेलकम ३’ सिनेमा २० डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

रवीना आणि अक्षय यांचं नातं

एक काळ असा होता जेव्हा अक्षय आणि रवीना यांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगल्या होत्या. दोघे एकमेकांवर प्रचंड प्रेम करत होते. रवीना आणि अक्षय यांचा साखरपुडा देखील झाला होता. पण अक्षय कुमार याने अभिनेत्रीची फसवणूक केल्यामुळे रवीनाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्याने दिली होती नात्याची कबुली..

एका मुलाखतीत खुद्द अक्षय कुमारने रवीना आणि शिल्पा शेट्टी यांच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला होता. अक्षय म्हणाला होता की, माझं त्या दोघींसोबत अफेअर होतं. अक्षयने प्रेमात फसवल्यानंतर रवीनाने अनिल थडानी यांच्यासोबत लग्न केलं. तर शिल्पा हिने उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.