Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18: सलमान खानमुळे शूटिंग न करताच अक्षय कुमार सेटवरून निघाला; नेमकं काय घडलं?

अभिनेता अक्षय कुमार 'बिग बॉस 18'च्या सेटवर ग्रँड फिनालेच्या शूटिंगसाठी पोहोचला होता. त्याने सेटवर तासभर प्रतीक्षा केली अन् अखेर शूटिंग न करताच तो तिथून निघून गेला. बिग बॉसच्या टीमकडून त्याला नंतर अनेक फोन कॉल्स करण्यात आले. मात्र त्याने शूटिंगला यायला नकार दिला.

Bigg Boss 18: सलमान खानमुळे शूटिंग न करताच अक्षय कुमार सेटवरून निघाला; नेमकं काय घडलं?
Akshay Kumar and Salman KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 19, 2025 | 9:00 PM

छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस 18’चा ग्रँड फिनाले आज (19 जानेवारी) पार पडतोय. तब्बल 105 दिवसांनंतर या शोचा विजेता जाहीर होणार आहे. प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकारांनाही या ग्रँड फिनालेची प्रचंड उत्सुकता असते. या फिनालेमध्ये बिग बॉसचे माजी स्पर्धकसुद्धा सहभागी होतात. त्याचसोबत इतरही मोठे सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतात. अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बिग बॉसच्या सेटवर पोहोचला होता. रविवारी दुपारपासूनच ग्रँड फिनालेच्या शूटिंगची सुरुवात झाली होती. सुमारे अडीच वाजताच्या सुमारास अक्षय कुमार सेटवर आला होता. त्याच्यासोबत ‘स्काय फोर्स’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता वीर पहाडियासुद्धा फिनालेमध्ये खास पाहुणा म्हणून पोहोचला होता. मात्र फिनालेचं शूटिंग न करताच अक्षय तिथून निघून गेल्याची माहिती समोर येत आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस 18’चा सूत्रसंचालक सलमान खान सेटवर उशीरा पोहोचल्याने अक्षय कुमार तिथून शूटिंग न करताच निघून गेला. अक्षय त्याच्या वेळापत्रकाबाबत खूपच सजग असतो, हे सर्वांनाच माहीत आहे. सेटवर वेळेचं तंतोतंत पालन होण्यासाठी तो आग्रही असतो. यानुसार तो दुपारी 2.15 वाजता बिग बॉसच्या सेटवर शूटिंगसाठी पोहोचला होता. मात्र तेव्हा सलमान सेटवर उपस्थित नव्हता. अक्षयने जवळपास तासभर सलमानची प्रतीक्षा केली. मात्र तरीसुद्धा सलमान सेटवर न आल्याने तो तिथून निघाला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

अक्षय कुमारला आगामी ‘जॉली एलएलबी 3’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी जायचं होतं. म्हणून तो बिग बॉसच्या सेटवर अधिक वेळ प्रतीक्षा करू शकला नाही. नंतर बिग बॉसच्या टीमकडून अक्षय कुमारला पुन्हा सेटवर बोलावण्यासाठी अनेक फोन कॉल्स करण्यात आले. मात्र अक्षयने शूटिंग करण्यास नकार दिला. अक्षय आणि सलमान यांनी आपापसांत चर्चा केली. त्यावेळी अक्षयने त्याला त्याच्या शूटिंगच्या वेळापत्रकाबद्दल समजावून सांगितलं. अक्षय कुमारनंतर वीर पहाडियाने बिग बॉसचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानेच टॉप 5 स्पर्धकांची नावं घोषित केली.

फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.