सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी काय घडलं होतं? मनोज बाजपेयी यांनी सोडलं मौन

Manoj Bajpayee on Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूत 'या' प्रकरणामुळे त्रासलेला, मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबद्दल मनोज बाजपेयी यांनी सोडलं मौन... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मनोज बाजपेयी यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा...

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी काय घडलं होतं? मनोज बाजपेयी यांनी सोडलं मौन
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 1:32 PM

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आजही कोणी विसरु शकलेलं नाही. फक्त चाहतेच नाहीतर, सेलिब्रिटी देखील सुशांत याच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या करताना दिसतात. आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते मनोज बायपेयी यांनी देखील सुशांत याच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुशांत याच्या निधनाच्या 10 दिवस आधी काय झालं होतं? याबद्दल अनेक वर्षांनंतर मनोज यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी एक गोष्ट सुशांत याला त्रास देत होती.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाले, ‘सुशांत याला ब्लाइंट आर्टिकल म्हणजे ज्या आर्टिकलमध्ये काहीही तथ्य नसेल अशा आर्टिकलमुळे सुशांत याला त्रास व्हायचा. तो प्रचंड उत्तम व्यक्ती होता. तो मला कायम विचारायचा सर मी काय करु? मी त्याला कायम बोलायचो रंगणाऱ्या चर्चांचा अधिक विचार करु नकोस..’

पुढे मनेज बाजपेयी म्हणाले, ‘ब्लाइंड आर्टिकलमुळे सुशांत याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं. सुशांत कायम बोलायला सर मला तुम्ही बनवलेलं मटण खायचं आहे. मी त्याला म्हणायचो जेव्हा बनवेल तेव्हा तुला नक्की खाऊ घालेल… त्यानंतर 10 दिवसांत सुशांत याने स्वतःला संपवलं.’

हे सुद्धा वाचा

‘आजपर्यंत दोन लोकांच्या निधनाचा मला विश्वास बसत नाही. सुशांत सिंह राजपूत आणि इरफान खान… दोघांचं निधन फार लवकर झालं. दोघांचे दिवस येणार होते…’ असं देखील मनोज बाजपेयी म्हणाले. मनोज बाजपेयी कायम त्यांच्या वक्तव्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असतात.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात सुशांत याने स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. पण तरी देखील अद्याप अभिनेत्याच्या निधनाचं खरं कारण समोर आलं नाही.

सुशांत याची बहीण श्वेता कायम अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल मोठे खुलासे करत असते. सुशांत सिंह राजपूत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली.

सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला. रिया आणि तिच्या भावाला सुशांत केस प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. सुशांत याच्या मृत्यू नंतर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.