Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

| Updated on: Jul 01, 2024 | 9:50 AM

युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. रविवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये अरमानची पहिली पत्नी पायल मलिक एलिमिनेट झाली. त्यावर आता नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

Bigg Boss OTT 3: वोटिंगचा ड्रामा कशाला? पायल मलिक एलिमिनेट होताच नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Payal Malik
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. रविवारी या सिझनमधून पायल मलिक बाद झाली. प्रेक्षकांकडून सर्वात कमी मतं मिळाल्याने पायलला बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. पायल तिचा पती अरमान मलिक आणि सवत कृतिका मलिक यांच्यासोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ‘जनतेनं आपला निर्णय जाहीर केला आहे. पायल मलिकला घराबाहेर जावं लागेल’, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय चुकीचा असल्याचं अनेकांनी म्हटलंय. ‘हे योग्य नाही. दीपक, नेझी, मुनिषा आणि सना सुलतान बिग बॉसच्या घरात काय करत आहेत? हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

‘पायलचं घराबाहेर जाणं चुकीचं आहे. हा पक्षपात आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘हे जग चांगल्या लोकांसाठी नाहीच आहे वाटतं. हे पुन्हा एकदा बिग बॉसच्या शोमधून सिद्ध झालंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी पायलला बिग बॉसची विजेती असल्याचं म्हटलंय. सूत्रसंचालक अनिल कपूर यांनी नॉमिनेशननंतर जनतेचा निर्णय ऐकवला. “बाहेरच्यांनी दोन स्पर्धकांना वाचवलं आहे. हे दोन स्पर्धक म्हणजे अरमान मलिक आणि दीपक चौरसिया. बिग बॉसच्या घरात साई केतन राव ‘बाहरवाला’ होता आणि त्याने सना सुलतानला एलिमिनेशनपासून वाचवलंय. आता घरातील नवीन ‘बाहरवाला’ लवकेश कटारिया बनला आहे,”

हे सुद्धा वाचा

रविवारी पायलसोबतच लवकेश कटारिया आणि शिवानी कुमार हे दोघंसुद्धा नॉमिनेट झाले होते. ज्यावेळी अनिलने स्पर्धकांना विचारलं की घराबाहेर कोण जाऊ शकतं, तेव्हा सर्वांनी आत्मविश्वासाने सांगितलं की त्यांचे चाहते त्यांना एलिमिनेशनपासून वाचवतील. मात्र रणवीर शौरी आणि सई यांनी पायलच्या एलिमिनेशनची शक्यता वर्तवली होती.

अनिल कपूरने जेव्हा अरमानला पायलच्या एलिमिनेशनविषयी विचारलं, तेव्हा तो म्हणाला, “मी तयार आहे. जर ती एलिमिनेट झाली, तर ती घरी जाऊन आमच्या चार मुलांचा सांभाळ करेल. जर ती बिग बॉसच्या घरात राहिली तर तिने एलिमिनेट होण्यासारखं काही केलेलं नाही.” त्यावर अनिल कपूर त्याला म्हणतात, “चित भी मेरी और पट भी मेरी”. म्हणजेच दोन्ही बाजूने आपलाच विजय होणार असल्याचं अरमानने म्हटलंय.

‘बिग बॉस ओटीटी 3’मधून आतापर्यंत दोन स्पर्धक बाहेर पडले आहेत. बॉक्स नीरज गोयत याआधी बाद झाला होता. त्यानंतर आता अरमान मलिकची पहिली पत्नी पायलला घराबाहेर जावं लागलं.