Salman Khan याने उद्ध्वस्त केलंय अनेक स्टार्सचं आयुष्य? भाईजान म्हणाला, ‘मी जेव्हा ड्रिंक करतो…’

| Updated on: May 01, 2023 | 12:00 PM

'चुका प्रत्येकाकडून होतात, पण ड्रिंग केल्यानंतर मी...', बॉलिवूडचा गॉडफादर असणाऱ्या सलमान खान याच्यावर अनेक स्टार्सचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे आरोप? अभिनेत्याने अखेर सोडलं मौन

Salman Khan याने उद्ध्वस्त केलंय अनेक स्टार्सचं आयुष्य? भाईजान म्हणाला, मी जेव्हा ड्रिंक करतो...
Follow us on

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाला मिळालेलं अपयश… अशा अनेक कारणांमुळे अभिनेता चर्चेत असतो. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. ज्यामुळे सलमान खान तुफान चर्चेत आला आहे. सलमान खान यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियता चाहत्यांना माहिती आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले. याच अनेक गोष्टींवर सलमान खान याने मौन सोडलं आहे.

सलमान खान याच्यावर अनेक आरोप करण्यात आले, पण बॉलिवूडचा गॉडफादर म्हणून देखील अभिनेच्याची ओळख आहे. सलमान खान याने अनेकांनी बॉलिवूडमध्ये संधी दिली. पण अनेक सेलिब्रिटींचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप देखील सलमान खान याच्यावर आहे. एका मुलाखतीत भाईजान याने स्पष्ट भूमिका मांडली आहे. ज्यामुळे सलमान खान चर्चेत आला आहे.

सलमान खान म्हणाला, ‘मी बॉलिवूडमध्ये फार कमी लोकांच्या संपर्कात आहे. जेव्हा मी कोणसोबत काम करतो, तेव्हाच त्या व्यक्तीसोबत माझं बोलणं होतं. मी प्रत्येक वेळी पार्टी देखील करत नाही. इंडस्ट्रीमध्ये माझे जे मित्र आहेत, ते वरिष्ठ आहे आणि काही माझे लहानपणीचे मित्र आहेत… कोणासोबत वाद घालण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘अशी काही लोकं आहेत, जे नशेमध्ये काहीही बोलतात. मी तुला सोडणार नाही… आणि बरंच काही. पण मी जेव्हा ड्रिंक करतो, तेव्हा म्हणतो… जावूदे ना…पण कधी-कधी चूक सर्वांकडून होते.’ असं देखील सलमान खान म्हणाला. सध्या सर्वत्र सलमान खान याचीच चर्चा आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सलमान खान याने प्रेमाबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘माझी लव्हस्टोरी माझ्यासोबत दफनभूमीत जाईल…’ प्रेमाबद्दल असं वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. प्रेमाच्याबाबतीत स्वतःला कमनशिबी म्हणत सलमान खान म्हणाला, ‘ज्यांनी जान बोलवं अशी माझी इच्छा होती, ते आता मला भाई म्हणत आहे… आता मी काय करु तुम्हीच सांगा..’ असं देखील अभिनेता म्हणाला.

लग्नाबद्दल अभिनेता पुढे म्हणाला, ‘कधी माझा होकार होता, तर तिचा नकार… काही कोणी होकार दिला पण माझा नकार होता… आता दोन्ही बाजूने नकार आहे… जर दोन्ही बाजूंनी नकार येत असेल तर… लग्न कसं होईल… पण अद्यापही वेळ आहे. आता मी ५७ वर्षांचा आहे… आता मला असं वाटतं सगळं अंतिम व्हायला हवं.. म्हणजे एक पत्नी असायला हवी…’ असं देखील सलमान खान म्हणाला.