Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कंगना रणौतकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा, ‘सासू – सासरे पळून गेले इतकं बदनाम…’

Kangana Ranaut: 'सासू - सासरे पळून गेले इतकं बदनाम...', जेव्हा कंगना रणौतचं ठरलेलं लग्न मोडलं, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना रणौत यांच्या खासगी आयुष्याची चर्चा...

कंगना रणौतकडून लग्नाबद्दल मोठा खुलासा, 'सासू - सासरे पळून गेले इतकं बदनाम...'
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 12:21 PM

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत स्टारर Emergency सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री अनेक मोठ्या आणि धक्कादायक गोष्टींचा खुलासा करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. होणारे सासू – सासरे घरी बसलेले असताना अशी काही परिस्थिती समोर आली, ज्यामुळे कंगना यांचे लग्न मोडलं.

नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना रणौत यांना खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ‘कोणत्या राजकारणी व्यक्तीसोबत लग्न करणार की कोणत्या अभिनेत्यासोबत?’ यावर कंगना यांनी मोठी खुलासा केला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

प्रश्नाचं उत्तर देत कंगना म्हणाल्या, ‘आया याबद्दल मी काय सांगू… लग्नाबद्दल माझ्या मनात चांगले विचार आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात एक जोडीदार असावा… स्वतःचं छोटं कुटुंब असावं… असं मला देखील वाटतं. पण आता लोकांनी मला बदनाम करून ठेवलं आहे. माझं लग्न होऊ देत नाहीत…’

‘कोर्टात माझ्या विरोधात इतक्या केस सुरु आहे. कोणासोबत लग्नाची बोलणी सुरु असेल तर माझ्या घरी पोलीस येतात. मला सतत समन्स येत असतात…’ असं सांगत कंगना रनौत हिने मोठा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांची चर्चा रंगली आहे.

कंगना रनौत म्हणाल्या, ‘एकदा तर माझे होणारे सासू – सासरे माझ्या घरी आले होते आणि समन्स आला. त्याक्षणी पाहुणे माझ्या घरातून पळून गेले… यामुळे देखील माझं लग्न होत नाहीये… माझं बोलणं खोटं वाटेल पण हे सत्य आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर कंगना यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केल्यानंतर कंगना यांनी राजकारणाकडे मोर्चा वळवला आहे.

कंगना रणौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या. राजकारणात प्रवेश केल्यामुळे कंगना चर्चेत असतात. कंगना कायम त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.