ऐश्वर्या राय हिने सोडले अभिषेक बच्चनचे घर?, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अत्यंत मोठा खुलासा, वाद…

Aishwarya Rai and Abhishek Bachchan divorce : गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसतंय की, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद सुरू आहे. हेच नाहीतर अभिषेक बच्चन याचे घर सोडून ऐश्वर्या माहेरी गेल्याचेही सातत्याने सांगितले जातंय. अंबानीच्या पार्टीतही ऐश्वर्या मुलीसोबत दाखल झाली.

ऐश्वर्या राय हिने सोडले अभिषेक बच्चनचे घर?, अखेर घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अत्यंत मोठा खुलासा, वाद...
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 12:31 PM

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांमुळे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या राय हिच्या आयुष्यात मोठे वादळ आले असून तिने अभिषेक बच्चन याचे घर सोडल्याचे सांगितले जात आहे. हेच नाहीतर लवकरच ती घटस्फोट घेणार आहे, अशी चर्चा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला बच्चन कुटुंबासोबत न येता ऐश्वर्या राय ही लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत पोहोचली. ज्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा अधिकच रंगताना दिसल्या. आता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद नेमक्या कोणत्या कारणामुळे सुरू आहे, याबद्दल अत्यंत मोठा खुलासा हा करण्यात आलाय. ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या संपर्कात देखील नाहीये.

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले की, माझी सर्व संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांची असेल. हेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी त्यांचा प्रतिक्षा हा बंगला थेट श्वेता हिच्या नावावर केला. काही वर्षांपासून श्वेता बच्चन ही तिच्या पतीसोबत राहात नाहीतर अमिताभ बच्चन यांच्यासोबतच त्यांच्या जलसा या बंगल्यावरच आपल्या मुलांसोबत राहाते.

मुळात म्हणजे ऐश्वर्या राय हिला हीच गोष्ट अजिबात आवडत नाही. श्वेता बच्चन ही जलसा बंगल्यात राहात असल्याने ती नाराज आहे. यामुळेच ऐश्वर्या राय हिने जलसा बंगला सोडत आपले माहेर गाठले आहे. बच्चन कुटुंबांपैकी अभिषेक बच्चन हा सोडला तर इतर ती कोणाला अजिबात बोलत देखील नाही. जलवा बंगल्यातून ऐश्वर्या ही एकटीच नाही गेली तर ती आपल्या मुलीला देखील सोबत घेऊन गेलीये.

श्वेता बच्चन हिच्यामुळेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातील वाद वाढल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीच काही फोटो व्हायरल झाले. त्या फोटोमध्ये श्वेता बच्चन ही बच्चन कुटुंबासोबत फोटोसाठी पोज देतानाही दोघींचे चेहरे बरेच काही सांगून जाताना दिसले. ऐश्वर्या रायही श्वेता बच्चन हिच्यामुळेच बच्चन कुटुंबांपासून दूर राहात असल्याचे सांगितले जातंय. लवकरच अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घटस्फोट घेतील, असेही रिपोर्टमध्ये सांगितले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातील फोटो व्हायरल झाल्याने बच्चन कुटुंबात सर्वकाही ठिक नसल्याचे अगोदरच स्पष्ट झाले. त्यामध्ये अनंत अंबानीच्या लग्नाचे सर्व फंक्शन झाल्यानंतर ऐश्वर्या राय ही थेट मुलगी आराध्या बच्चन हिला घेऊन विदेशात गेली. कोणतेही फंक्शन असो किंवा पार्टी ऐश्वर्या राय ही एकटी किंवा आपल्या मुलीसोबत दाखल होते. बच्चन कुटुंबासोबत ती कधीच दाखल होत नाही.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.