धमकी मिळाल्यानंतर बिग बॉसच्या शुटींगसाठी सलमान सेटवर, 60 गार्ड हाय अलर्टवर

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी मिळाली आहे. यावेळी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर त्याची सुरक्षा आधीच वाढवण्यात आली आहे. तरीही, सलमान खान बिग बॉस १८ च्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला. कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून शूटिंग सुरू आहे.

धमकी मिळाल्यानंतर बिग बॉसच्या शुटींगसाठी सलमान सेटवर, 60 गार्ड हाय अलर्टवर
Follow us
| Updated on: Oct 18, 2024 | 6:19 PM

सलमान खान याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा एकदा धमकी आहे. यावेळी सलमान खानकडून ५ कोटीची मागणी करण्यात आली आहे. सलमानला एकीकडे धमक्या मिळत असताना सलमान खान बिग बॉसच्या शुटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे. सलमान खानच्या जीवाला धोका आहे. त्यातच सलमान खानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आल्यानंतर सलमानच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी सलमानला पुन्हा एकदा धमकी आली असताना ही तो शुटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव सलमान खान शुटिंगला जाणार नसल्याचं आधी म्हटलं जात होतं. पण सलमान खानने बाहेर पडून शुटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शूटिंगसाठी तो फिल्मसिटीला पोहोचलाय. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुरुवारी देखील सलमान कडक सुरक्षेत बिग बॉस 18 च्या सेटवर पोहोचला होता.

ETimes च्या माहितीनुसार, सेटवर सलमानसाठी एक खास कंपाउंड बनवण्यात आले आहे, ज्यामध्ये कोणालाही प्रवेश नाहीये. कंपाउंडच्या आत सलमानचा बंगला आहे, जेथे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे. येथे ओळखपत्र दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे.

‘बिग बॉस 18’ च्या टीमला शूट संपेपर्यंत सेटवरच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कुठेही बाहेर जाता येणार नाहीये. शूटिंग दुपारच्या जेवणानंतर सुरू झाली आहे. जी रात्रीपर्यंत चालणार आहे. सलमान खानने त्याच्या चित्रपटाचे शुटिंगही पूर्ण करण्यासाठी मनाची तयारी केली आहे.

सलमान खान शुटिंग करत असलेल्या सेटवर 60 सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. 18 ऑक्टोबरला सकाळी सलमानला धमकीचा मेसेज आला होता. लॉरेन्स बिश्नोईसोबतचे वैर संपवण्यासाठी सलमानकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. 1998 पासून जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमानचे नाव समोर आले तेव्हापासून लॉरेन्स बिश्नोई सलमानच्या मागे लागला आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत तर वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला Y+ सुरक्षा दिली होती. यासोबतच शेराची खासगी सुरक्षाही आहे, जी सलमानची सुरक्षा करत आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास 40 लोक आहेत.

सलमानच्या Y+ सुरक्षेत 2-4 कमांडोसह 11 पोलीस आहेत. मात्र आता या सुरक्षेत आणखी वाढ केली जाणार आहे. सलमान खान जिथे जाईल तेथील पोलीस स्टेशनला त्याआधी माहिती दिली जाईल. त्या जागेची स्थानिक पोलिसांकडून कसून चौकशी केली जाईल. तसेच सलमानसोबत एक पोलीस देखील आहे. जो सर्व प्रकारची शस्त्रे वापरण्यात माहीर आहे.

Non Stop LIVE Update
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी
जागावाटपावरून ठाकरे गट अन् पटोलेंमधील वाद पेटला, मविआत बिघाडी.
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?
शिवाजी पार्कवर मनसेचा दावा, शेवटचा षटकार लगावणार?; रडारवर कोण?.
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'
'विधानसभेच्या एका टप्प्यातच जनता विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करणार'.
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?
'सून बाजूला झाली पण सूनेच्या वाटेला...', अजित पवारांवर कोणाचा निशाणा?.
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'
'काँग्रेसने ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा, अन्यथा...'.
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास
'शरद पवार मला..'; जागा वाटपावरून माजी आमदारानं काय व्यक्त केला विश्वास.
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल
'राणेंना कंटाळून मोठे पदाधिकारी बाहेर...',ठाकरेंच्या नेत्याचा हल्लाबोल.
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?
'बच्चू कडू गंजेडी ते गांजा पिऊन बोलत होते', रवी राणांची जहरी टीका काय?.
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव
झणझणीत तर्री अन् पाव, राज ठाकरेंनी पत्नी शर्मिलांसह मारला मिसळवर ताव.
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं
लाडकी बहीण योजनेवरून टीका करणाऱ्या राऊतांना शहाजीबापूंनी फटकारलं.