Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमिताभ बच्चन, शाहरुख, अजय, रणवीर सिंगविरोधात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुझफ्फरपूरमधील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारीसमोर ही याचिका दाखल केली. अशा प्रकारच्या ब्रँडच्या जाहिराती करून कलाकारांनी लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

अमिताभ बच्चन, शाहरुख, अजय, रणवीर सिंगविरोधात याचिका दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
Amitabh, Ajay, Shahrukh and RanveerImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 11:37 AM

बिहारमधील न्यायालयासमोर गुरुवारी दाखल केलेल्या याचिकेत अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्यावर गुटखा आणि तंबाखूच्या सेवनाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून अजय देवगण हा तंबाखू (tobacco) ब्रँड ‘विमल’चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तर गेल्या वर्षी शाहरुख खानही (Shah Rukh Khan) ‘विमल’च्या जाहिरातीत झळकला. अमिताभ बच्चन यांनीसुद्धा ‘कमला पसंद’साठी ब्रँड ॲम्बेसेडरची ऑफर स्वीकारली होती. तर रणवीर सिंगनेही पान मसालाची जाहिराती केली होती. बिहारमधील सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी मुझफ्फरपूरमधील न्यायालयात मुख्य न्यायदंडाधिकारीसमोर ही याचिका दाखल केली. अशा प्रकारच्या ब्रँडच्या जाहिराती करून कलाकारांनी लोकांना तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे.

गुटखा आणि पान मसालाची जाहिरात स्वीकारून आपल्या सेलिब्रिटी स्टेटसचा गैरवापर करणाऱ्यांमध्ये तमन्नाने अभिनेता रणवीर सिंगचं नावदेखील घेतलं आहे. या कलाकारांविरुद्ध आयपीसी कलम 311, 420, 467 आणि 468 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात तंबाखू ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातीत झळकल्यामुळे अभिनेता अक्षय कुमारवर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर अक्षयने जाहिरातीतून माघार घेतली. विमलच्या या जाहिरातीत अजय देवगण आणि शाहरुख खानदेखील होते.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

ऑक्टोबर 2021 मध्ये अमिताभ बच्चन यांनी ‘कमला पसंद’या च्युइंग तंबाखूच्या ब्रँडसोबतचा त्यांचा करार रद्द केला होता. अमिताभ यांना काही तपशीलांची माहिती नसल्याचं त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनात स्पष्ट केलं. ‘अमिताभ बच्चन हे जेव्हा ब्रँडशी जोडले गेले, तेव्हा त्यांना माहित नव्हतं की ते तंबाखूच्या जाहिरातींच्या अंतर्गत येतं. आता त्यांनी ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्याचसोबत जाहिरातीसाठी मिळालेले पैसे परत केले आहेत,’ असं त्या निवेदनात म्हटलं होतं. नोव्हेंबरमध्ये बिग बींनी संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. करार संपुष्टात येऊनही कंपनीने त्यांच्या जाहिरातींचे प्रसारण सुरू ठेवल्याने त्यांनी ही नोटीस पाठवली होती.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.