Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : अरे बाप रे बाप, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या थरारक विजयावर बिग बी म्हणाले…

India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे संपूर्ण देशाचं लक्ष असतं सामन्याकडे... भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या थरारक विजयावर बिग बी म्हणाले..., अनेक सेलिब्रिटींनी केलं भारतीय क्रिकेटपटूंचं कौतुक...

IND vs PAK : अरे बाप रे बाप, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या थरारक विजयावर बिग बी म्हणाले...
अमिताभ बच्चन
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 10:06 AM

India vs Pakistan T20 World Cup 2024 : भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणजे काही सांगायलाच नको. दोन्ही देशांच्या नजरा फक्त सामान्याकडे असतात. रविवारी देखील असंच काही झालं. रविवारी झालेल्या T20 वर्ल्ड कपच्या सामन्यात 6 धावांनी टीम इंडियाने बाजी मारली. भारताकडून झालेला पराभव पाकिस्तानच्या जिव्हारी लागला. पण अटी-तटीच्या सामन्यात टीम इंडियाच बाजी मारली आणि पाकिस्तानला अपयश मान्य करावा लागला. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांच लक्ष्य दिलं होतं. पाकिस्तानी टीम निर्धारित 20 षटकात 7 बाद 113 धावाच करु शकली. 6 धावांनी टीम इंडियाने बाजी मारली.

भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. फक्त भारतीयांनी नाहीतर, सेलिब्रिटींनी देखील विजयावर आनंद व्यक्त केला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक्सवर एक पोस्ट करत आनंद व्यक्त केल्या आणि टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या…

एक फोटो पोस्ट करत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘टी 5037(i) – अरे बाप रे बाप! Ind v Pak सामना पाहात होतो… पण मध्येच टीव्ही बंद केला… कारण आपण हारत आहोत असं वाटलं… अचानक इंटरनेट पाहिलं आणि आपण जिंकलो, आपण जिंकलो, आपण जिंकलो!!! भारत भारत भारत भारत भारत भारत भारत…’ असं म्हणत बिग बी यांनी आनंद व्यक्त केला.

फक्त अमिताभ बच्चन यांनी नाही तर, अभिनेत्री प्रिती झिंटा हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला. अभिनेत्री म्हणाली, ‘वाह काय सामना होता… कसलं पुनरागमन आणि कसली झुंज…. 119 धावांचा बचाव करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला पूर्ण गुण…’ शिवाय अभिनेत्रीने क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याला देखील दमदार खेळीसाठी टॅग केलं आहे….

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने देखील सोशल मीडियाच्या माध्यामातून आनंद व्यक्त केला. अभिनेता म्हणाला, ‘काय विजय होता… भारतीय टीम… खरंच… #हॅप्पीसंडे’, आनंद व्यक्त करत अभिनेत्री श्रद्धा कपूर म्हणाली, ‘मला खूप आनंद होत आहे जणू मी सुद्धा 2-3 विकेट घेतल्या आहेत.’ भारताच्या विजयानंतर विजय वर्मा, जयदीप अहलावत, सनी हिंदुजा, ईशान खट्टर, श्रद्धा कपूर, कुणाल खेमू, बॉबी देओल, संजय कपूर, कार्तिक आर्यन यांनी आनंद साजरा केला…

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.