जर मी नशा केली नसती..; पहिल्या लग्नाविषयी जावेद अख्तर यांच्याकडून खंत व्यक्त

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या लग्नाविषयी व्यक्त झाले. जावेद यांनी हनी इरानी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. या मुलाखतीत अख्तर यांनी पहिल्या लग्नाविषयीची खंत व्यक्त केली.

जर मी नशा केली नसती..; पहिल्या लग्नाविषयी जावेद अख्तर यांच्याकडून खंत व्यक्त
Javed AkhtarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 8:18 AM

मुंबई : 20 मार्च 2024 | गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतात. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं. मात्र शबाना या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जावेद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इरानी आहे. या दोघांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद यांनी शबाना यांच्याशी दुसरं लग्न केलं. आता जवळपास 40 वर्षांनंतर जावेद अख्तर त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पहिला संसार मोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

जावेद अख्तर यांची खंत

जावेद अख्तर म्हणाले की त्यांना दारूचं खूप वाईट व्यसन होतं आणि याच कारणामुळे हनी इरानीसोबतचं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. “मला खात्री आहे की जर मला दारूचं व्यसन नसतं आणि जर मी आणखी जबाबदार असतो, तर कहाणी थोडी वेगळी असती”, अशी खंत अख्तर यांनी व्यक्त केली. हनी इरानी यांच्याशी बऱ्याच काळापूर्वी घटस्फोट झाला असला तरी आजरी त्यांच्याशी चांगली मैत्री असल्याचंही अख्तर यांनी सांगितलं. “माझी पहिली पत्नी हनी इरानी एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे आणि आजही मी तिचा तितकाच आदर करतो. ती माझी आजही सर्वांत चांगली मैत्रीण आहे”, असं अख्तर म्हणाले.

शबाना आझमींनी कसं डील केलं?

या मुलाखतीत जेव्हा जावेद अख्तर यांना विचारण्यात आलं की शबाना आझमी यांनी तुमच्या दारूच्या व्यसनाशी कसं डील केलं, तेव्हा ते पुढे म्हणाले, “सुरुवातीची दहा वर्षे तिने सांभाळून घेतलं. मात्र नंतर तिने दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीशीच लग्न केलं (हसतात). लग्नाच्या काही काळानंतर मी दारूचं व्यसन सोडलं आणि पुन्हा कधीच त्याच्या वाटेला गेलो नाही.”

हे सुद्धा वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्नगाठ बांधली. पती जावेद अख्तर यांच्यासोबतच्या नात्याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणाल्या, “जावेद आणि मी खूप भांडतो. कधी कधी वाद इतके टोकाला जातात की आम्हाला एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो. पण दिवसाअखेर एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. आमचं नातं असंच आहे. आमचा दृष्टीकोन इतका समान आहे की आम्हाला अरेंज्ड मॅरेज करायला पाहिजे होतं.”

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.