Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाईट वागणुकीबद्दल नातीसमोर व्यक्त झाल्या जया बच्चन; म्हणाल्या “तुझ्या आजोबांना मी कधीच..”

अमिताभ आणि जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाचा वॉडकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'व्हॉट द हेल नव्या'चा हा दुसरा सिझन असून त्यामध्ये जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी तिघींमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या.

वाईट वागणुकीबद्दल नातीसमोर व्यक्त झाल्या जया बच्चन; म्हणाल्या तुझ्या आजोबांना मी कधीच..
नातीसमोर जया बच्चन झाल्या व्यक्तImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 9:15 AM

मुंबई : 9 फेब्रुवारी 2024 | अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या व्हॉडकास्टचा दुसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडला गुरुवारी तिच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘लव्ह आज कल’ असं शीर्षक असलेल्या या एपिसोडमध्ये नव्याने तिची आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चन यांच्यासोबत प्रेम आणि नातं यांविषयी मोकळेपणे गप्पा मारल्या आहेत. एखाद्या नात्यात कोणती गोष्ट सर्वांत महत्त्वाची असते, ‘रेड फ्लॅग’ ही नवी संकल्पना काय, जया बच्चन यांना कोणती गोष्ट ‘रेड फ्लॅग’ वाटते, हे सर्व या एपिसोडमध्ये ऐकायला मिळालं.

आधी नव्याने आजी जया बच्चनला ‘रेड फ्लॅग’ म्हणजे नेमकं काय हे समजावलं. ती संकल्पना समजल्यानंतर जया म्हणाल्या, “नात्यातील वाईट वागणूक किंवा व्यवहार हा माझ्यासाठी सर्वांत मोठा रेड फ्लॅग असेल. जेव्हा लोक तू किंवा तुम असं संबोधतात, तेव्हा मला खूप राग येतो. तू कधी मला तुझ्या आजोबांना (अमिताभ बच्चन) तुम म्हणून बोलताना ऐकलंस का? हे ऐकायलाही फार अपमानास्पद वाटतं.”

हे सुद्धा वाचा

यानंतर नव्याची आई यावर तिची मतं मांडते. “तोंडून बोलून केलेली हिंसा असो किंवा शारीरिक हिंसा.. मी या कोणत्याच गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. नात्यात एकमेकांविषयी आदर असणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुमचा जोडीदार तुम्हाला म्हणत असेल की एखाद्या गोष्टीमुळे त्याला त्रास होतोय, तर ती गोष्ट करू नये आणि त्यावर विचार करावा. इतकंच नव्हे, जर तुमचा पार्टनर तुमची माफी मागत असेल तर तुम्हाला ते भांडण फार खेचण्याची गरज नाही. कारण त्यांनी आधीच माफी मागितली आहे”, असं श्वेता नंदा म्हणाली.

या व्हॉडकास्टमध्ये नव्या पुढे महिलांच्या एकट्या राहण्याचा मुद्दा मांडते. “हे जग इतकं पुढे गेलंय, मात्र तरीही सध्याच्या घडीला महिलांनी सिंगल राहणं कठीणच आहे. लोकांना असं वाटतं की महिलेचा उद्देश हा फक्त मुलांना जन्म देण्याचा असावा. म्हणूनच तिच्यावर लग्नासाठी दबाव आणला जातो. समाज अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे की पुरुषांनी एकटं राहणं ठीक आहे. पण महिलांसाठी ते सोपं नाही. कधीही घाईगडबडीत लग्न करू नका. जेव्हा तुम्ही भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तेव्हाच पालक होण्याचा निर्णय घ्या” असं ती म्हणते.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.