Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!

गीतकार दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण अवघं इयत्ता पाचवीपर्यंतच झालं होतं. (know about damodar shirwale's hit bhim geet)

पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!
damodar shirwale
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 5:27 PM

मुंबई: गीतकार दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण अवघं इयत्ता पाचवीपर्यंतच झालं होतं. त्यांनी गाणं शिकण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु केवळ 12 रागच ते शिकू शकले. कारण त्यांचं पाठांतर होत नसे. त्यामुळे त्यांनी गाणं शिकणंही सोडलं. पण या रागाच्या बिदागीवरच त्यांनी दर्जेदार गाणी लिहिली. (know about damodar shirwale’s hit bhim geet)

इयत्ता पाचवीनंतर शाळा सोडली

दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण खूप उशिरा सुरू झालं. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना पहिल्या इयत्तेत टाकण्यात आलं होतं. वर्गात ते सर्व मुलांमध्ये थोराड दिसायचे. वाढते वय आणि गरीबी यामुळे त्यांचं शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झालं. 1966 मध्ये ते राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये कामाला लागले. 1970मध्ये ते परमनंटही झाले. 2005मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ वाचन, लिखाण आणि गायन याला त्यांनी दिला होता.

12 राग ठरली जीवनाची पुंजी

शिरवाळे यांनी 1964 पासून गायनास सुरुवात केली. त्यांनी दामोदर शिरवाळे आणि पार्टीची स्थापना केली होती. सुरुवातीला ते दुसऱ्या गायकांची गाणी गायचे. शिरवाळे यांना उत्तम गायक व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी चेंबूरमधील पंडित नारायणगावकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. सात महिने त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. संगीताचे धडे घेत असतानाचा एक किस्सा आहे. नाराणगावकर यांनी त्यांना प्रथम यमन राग दिला. त्यानंतर भोग, काफी आणि केदार राग दिला. पण शिरवाळे यांचं पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायचं. तब्बल सात महिने हे असंच सुरू होतं. ते सर्व राग विसरायचे. या सात महिन्यात जेमतेम 12 राग शिकल्यानंतर त्यांनी गाणं शिकणंच बंद केलं. मात्र, या अर्धवट ज्ञानाचाही त्यांना फायदा झाला. त्यांना गाण्याच्या चाली बांधण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मीटरचं इंगित त्यांना समजलं.

गाजलेली लोकगीतं

शेजारीण बाई, तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, बाबूला आतमधी घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या…

आणि

मनात हाय आता सांगू मी काय, कशी काय येऊ मी रंगतीला, म्हातारा नवरा गंमतीला…

आणि

कशाचं खरं खोटं पिकतंय रं, गेलं ते असली, नकली विकतंय रं…

आणि

खंडोबा रायाचं याड बाई लागलं, मुरळीला, लागलं मुरळीला, याड बाई लागलं वाघ्याला…

आणि

घाईन जाऊन लाईन लावून, तिकीट काढायचं, या वेडीला मनकवडीला माहेरी धाडायचं….

गाजलेली आंबेडकरी गीते

भीमानं दिलं ते गगनासम निशाण आहे, निळा झेंडा, निळ्या टोपीचा स्वाभिमान आहे…

आणि

बोले गाव गाव बाई बोले गाव गावं भीमाईचा बाळ त्याचं नाव भीमरावं…

आणि

नऊ कोटींची माता रमाई, उदार अंत:करणाची, रमाई झाली स्फूर्ती ज्योती, भीमराव आंबेडकरांची…

आणि

आसित मुनीची ती भविष्यवाणी, आली आली फळाला, सिद्धार्थ सम्यक समबुद्ध झाला…

आणि

रमाबाईचा जन्म झाला, वाटा साखर पानं… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know about damodar shirwale’s hit bhim geet)

संबंधित बातम्या:

‘खंडोबा रायाचं याड बाई…’, ‘म्हातारा नवरा गंमतीला…’ ‘कशाचं खरं खोटं…’ या गाण्यांचा गीतकार माहीत आहे का?

‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का?

आनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण?; हा किस्सा वाचाच!

(know about damodar shirwale’s hit bhim geet)

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.