Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Bajpayee | मनोज बाजपेयींनी 14 वर्षांपासून केलं नाही डिनर; असं करण्यामागचं कारण काय?

सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला.

Manoj Bajpayee | मनोज बाजपेयींनी 14 वर्षांपासून केलं नाही डिनर; असं करण्यामागचं कारण काय?
Manoj BajpayeeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 5:38 PM

मुंबई : आपल्या दमदार भूमिकांसाठी ओळखले जाणारे अभिनेते मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या डाएटविषयी महत्त्वाचा खुलासा केला. गेल्या 14 वर्षांपासून त्यांनी रात्रीचं जेवण केलंच नाही. रात्री काहीच खात नसल्याचं त्यांनी सांगितलं. मनोज बाजपेयी हे त्यांच्या आरोग्यासाठी असं करतात. सर्वसाधारणपणे लोक फिट राहण्यासाठी व्यायाम आणि योग करतात, जिमला जातात आणि तिन्ही वेळा योग्य डाएट फॉलो करतात. मात्र मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या रुटीनमधून डिनरला पूर्णपणे काढून टाकलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी डिनर करणं का सोडून दिलं, याविषयीचा खुलासा केला.

अशी झाली सुरुवात

“या गोष्टीला 13-14 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी विचार केला की माझे आजोबा माझ्यापेक्षाही बारिक होते पण ते नेहमीच फिट असायचे. मी सुद्धा त्यांचं रुटीन फॉलो करून पाहतो, असं ठरवलं होतं. त्यांच्यासारखा दिनक्रम पाळू लागलो तेव्हा माझं वजन नियंत्रणात आलं होतं. मी दिवसभर उत्साही असायचो आणि मला फार निरोगी वाटायचं. तेव्हा मी ठरवलं की आता आयुष्यभर मी हाच नियम पाळणार”, असं त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

“दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनत नाही”

मनोज बाजपेयीने पुढे म्हटलं, “मी कधी 12 तास तर कधी 14 तास उपवास करून पाहिलं. हळूहळू मी रात्रीचं जेवण बंद केलं. दुपारच्या जेवणानंतर किचनमध्ये काहीच बनायचं नाही. जेव्हा आमची मुलगी हॉस्टेलमधून घरी येते, तेव्हाच दुपारनंतर जेवण बनवलं जातं.”

सुरुवातीला हे रुटीन फॉलो करणं खूप कठीण गेल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणूनच भूक मिटवण्यासाठी ते पाणी प्यायचे आणि बिस्किट खायचे. मनोज बाजपेयीच्या मते या रुटीनमुळे त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये बराच मोठा बदल झाला. याच कारणामुळे मला कोलेस्ट्रॉल किंवा डायबिटीज नाही, असं तो सांगतो.

निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला
निवडणूक हरलो, मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण. ; गडकरींचा जातीयवादावर टोला.
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'
राऊतांकडून उदय सामंतांचं तोंडभरून कौतुक, 'त्यांचं अभिनंदन, कारण..'.
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती
बीडचा बिहार झालाय का? संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती.
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून
तुमच्या कारला फास्टटॅग आहे? असेल तर हा व्हिडीओ बघा, कारण 1 एप्रिलपासून.
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्
'बीडमध्ये चाललंय काय? सरकार काय करतंय?' दमानियांच्या डोळ्यात अश्रू अन्.
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.