निधनानंतर अभिनेत्रीच्या पोटात डॉक्टरांना दिसली धक्कादायक गोष्ट, शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी नाही स्वीकारला मृतदेह

Actress Life : चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्रीचा अंत होता अत्यंत वाईट, 2 - 3 दिवस खोलीत होता मृतदेह, पोटात डॉक्टरांना दिसली धक्कादायक गोष्ट, शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी नाही केले अंत्यसंस्कार... निधनानंतर देखील अभिनेत्री असते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत...

निधनानंतर अभिनेत्रीच्या पोटात डॉक्टरांना दिसली धक्कादायक गोष्ट, शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी नाही स्वीकारला मृतदेह
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 2:46 PM

झगमगत्या विश्वातील ग्लॅमर, रॉयल आयुष्य, पैसा, प्रसिद्धी… अशा अनेक गोष्टी सामान्य जनतेला आकर्षित करत असतात. पण अनेकादा समोर दिसणारी बाजू वेगळी असते आणि सत्य फार कोणाला माहिती देखील नसतं. बॉलिवूडच्या अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. पण अभिनेत्रींचा अंत मात्र फार वाईट झाला. कुटुंबियांकडून अभिनेत्रींवर अंत्यसंस्कार देखील झाले नाहीत. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी…

परवीन बाबी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण परवीन बाबी डायबिटीज आणि सिजोफ्रेनिया नावाच्या गंभीर आजाराचा सामना करत होत्या हे सत्य समोर आलं नव्हतं… आजारामुळे बॉयफ्रेंडने देखील परवीन बाबी यांची साथ सोडली.. असं देखील सांगितलं जातं… तेव्हा महेश भट्ट आणि परवीन एकत्र होते.

दरम्यान, 1983 मध्ये परवीन बाबी एका सिनेमाचं शुटिंग करत होत्या. तेव्हा 30 जुलै 2024 मध्ये सेटवरुन गायब झाल्या. तेव्हा परवीन बाबी यांना अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत पाहाण्यात आलं आहे… अशा देखील चर्चा जोर धरू लागल्या होत्या. अखेर 1984 मध्ये जेव्हा परवीन बाबी यांना न्यूयॉर्क विमानतळावर स्पॉट करण्यात आलं, तेव्हा पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आणि वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 6 वर्षानंतर म्हणजे 1989 मध्ये परवीन बाबी मुंबईत आल्या…

हे सुद्धा वाचा

मुंबईत परतल्यानंतर परवीन बाबी जुहू येथील घरात एकट्याच राहायच्या. लोकांसोबत त्या फक्त फोनवरून संपर्क साधायच्या. शिवाय बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील त्यांच्यापासून दूर राहाणं योग्य समजलं. अखेर 20 जानेवारी रोजी परवीन बाबी यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली. परवीन यांचं निधन देखील धक्कादायक होतं. त्याच्या घराबाहेर तीन दिवसांचं दूध, न्यूजपेपर तसंच पडलं होतं. शेजाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. शिवाय त्यांच्या घरातून दुर्गंधी देखील येऊ लागली होती.

परवीन बाबी यांच्या निधनला 72 तसांपेक्षा अधिक काळ लोटला होता. पण त्यांचे कुंटुंबिय आले नाही. शेवटच्या क्षणी देखील परवीन बाबी यांच्यासोबत कोणीही नव्हतं… अशात शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं, पोलीस घटस्थळी आले आणि त्यांनी दरवाजा तोडला. समोर परवीन बाबी यांचं मृतदेह पडलेला होता.

त्यानंतर परवीन बाबी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तेव्हा डॉक्टरांच्या समोर धक्कादायक गोष्ट आली. त्यांच्या पोटात एकही अन्नाचा कण नव्हता. तीन ते चार दिवसांपासून त्या जेवल्या नव्हत्या. पण त्यांच्या पोटात डॉक्टरांना फक्त दारु आढळली… रिपोर्टनुसार, परवीन बाबी यांचं निधन भूक, डायबिटीज आणि अवयव निकामी झाल्यामुळे झाला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.