Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raveena Tandon | अखेर अक्षयसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली रवीना; अफेअरमुळे शिल्पाशीही तोडली होती मैत्री

90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.

Raveena Tandon | अखेर अक्षयसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली रवीना; अफेअरमुळे शिल्पाशीही तोडली होती मैत्री
Raveena Tandon, Akshay Kumar, Shilpa ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 12:35 PM

मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन आणि अभिनेता अक्षय कुमार ही जोडी नव्वदच्या दशकात तुफान चर्चेत होती. रवीना आणि अक्षयचं अफेअर इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता बऱ्याच वर्षांनंतर रवीना याविषयी मोकळेपणे व्यक्त होताना दिसतेय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती अक्षयसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली. याच मुलाखतीत तिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबतच्या मैत्रीविषयीही भाष्य केलं. शिल्पा आणि अक्षयसुद्धा नव्वदच्या दशकात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. अक्षय कुमारसोबतच्या अफेअरमुळेच शिल्पा आणि रवीनाच्या मैत्रीत कटुता आली होती.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रवीना म्हणाली, “अक्षय आणि मी आताही चांगले मित्र आहोत. प्रत्येकाच्या आयुष्याचा एक प्रवास असतो. तुम्हाला त्याचा आदर करावा लागतो आणि त्यातून पुढे जावं लागतं. मी त्याचा खूप आदर करते. माझ्या तो या इंडस्ट्रीचा सर्वांत मजबूत स्तंभ आहे.” यावेळी शिल्पासोबतच्या मैत्रीविषयी विचारलं असता ती पुढे म्हणाली, “काही गोष्टींमुळे आमच्यातलं नातं सुधारलं. काही अनुभवांमुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो. शमिता आणि शिल्पा माझ्या पतीच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. चांगला आणि वाईट काळ आम्ही एकमेकांसोबत घालवतो.”

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच रवीना आणि अक्षयला बऱ्याच वर्षांनंतर एकत्र पाहिलं गेलं होतं. एका पुरस्कार सोहळ्यात या दोघांनी हजेरी लावली होती. त्यावेळी दोघांचा गप्पा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पहा व्हिडीओ

अक्षय आणि रवीनाने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मोहरा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 1995 पासून दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. त्या काळात या दोघांची जोडी सर्वाधिक चर्चेत होती. त्यांच्या अफेअरचे किस्से आजही चवीने चघळले जातात. 90 च्या दशकात या दोघांचा साखरपुडाही झाल्याच्या चर्चा होत्या. मात्र काही कारणास्तव त्यांचं लग्न मोडलं. नंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्नगाठ बांधली.

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना
राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे कुटुंबासह परदेश दौऱ्यावर रवाना.
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी
'अभिनंदन ठाकरे बंधूंनो, मनापासून एकत्र या..', शिवसेना भवनसमोर बॅनरबाजी.
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?
संतोष देशमुखांच्या घराजवळ फिरणारी 'ती' महिला कोण?.
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.