AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तर बाप म्हणून मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते…”; संजय दत्त असं का म्हणाला ?

संजय दत्तने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या मुली त्रिशलाबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं आहे. संजय दत्त सध्या भूमी' चित्रपटात व्यस्त आहे. तेव्हा मीडियाशी संवाद साधताना त्याला त्याच्या मुलीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा त्याने हे वक्तव्य केलं आहे. त्याने त्याच्या मुलीबद्दल केलेलं हे वक्तव्य ऐकून तिथे असलेले सर्वच थक्क झाले. पण संजयने त्याच्या मुलीच्याबाबतीत असं वक्तव्य का केलं?

तर बाप म्हणून मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते...; संजय दत्त असं का म्हणाला ?
Sanjay Dutt daughter
Follow us
| Updated on: Mar 10, 2025 | 1:01 PM

बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांच्या मुलंही आता अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. त्यात शाहरुख खान पासून ते सैफ अली खानपर्यंत सर्वांचीच मुलं आता बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे जो सुपरस्टार असून त्याने 90 च्या दशकापासून बॉलिवूडवर आपली वेगळी छाप पाडली आहे. पण त्याच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात येणं पसंत नाही.

संजयने ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन मुलीबद्दल दिली प्रतिक्रिया

हा अभिनेता आहे संजय दत्त. ज्याने आपल्या स्टाइलने आज बॉलिवूड गाजवलं आहे. मुन्नाभाई म्हणून ज्याने लोकांच्या मनावर राज्य केलं त्याला मात्र त्यांच्या मुलांसाठी बॉलिवूड हा करिअर ऑप्शन अजिबात मान्य नाही. सध्या संजय दत्त ‘ भूमी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यामध्ये मोठी उत्सुकता असून आग्रा येथे झालेले शूटिंग पहायला मोठी गर्दीही झाली होती. या चित्रपटासंबंधी एका पत्रकार परिषदेचं दिल्लीत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संजयने चित्रपटासंबंधित तसेच त्याच्या ऑनस्क्रिन मुलीबद्दल म्हणजेच अदिती राव हैदरीबद्दल अनेक प्रश्नांचीही उत्तरे दिली.

“तर…मी माझ्या मुलीचे पाय तोडले असते”

दरम्यान याचवेळी त्याला त्याची खरी मुलगी त्रिशला बद्दलही प्रश्न विचारण्यात आले. त्रिशला आणि आदिती मध्ये काय साम्य आहे असं त्याला विचारण्यात आलं तेव्हा संजय दत्त म्हणाला ‘ जर त्रिशालाने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला असता तर मी तिचे पायच तोडले असते. पण, आदितीसोबत म्हणजेच माझ्या ऑनस्क्रिन मुलीसोबत मी असं काहीही करणार नाही.’ त्याच्या या उत्तरामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

“मला आनंद आहे की माझ्या मुलीच्या डोक्यातून ते भूत गेलं”

आपल्या मुलांनी आपला अभिनयाचा वारसा पुढे चालवावा असं प्रत्येकाला वाटते, मात्र संजयला तसं वाटत नसल्याचं आणि त्याला ते आवडतही नसल्याचं त्याच्या उत्तरावरून स्पष्ट झालं. तसेच तो पुढे म्हणाला होता की “मला आनंद आहे की सध्या तरी माझ्या मुलीच्या मनातून अभिनयाचे भूत निघून गेलं आहे. निदान सध्या तरी तिने अभिनयाचा छंद सोडून दिला आहे. ती इतकी हुशार मुलगी आहे की तिने फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास केला आहे”

मुलीच्या प्रेमाविषयी समजलं तर…

संजय दत्तची दोन लग्न झाली असून त्याची दुसरी पत्नी मान्यता दत्तपासून दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. संजय त्या दोघांबद्दल खूप प्रोटेक्टीव आहे. अनेकदा त्याने हे सांगितले आहे की तो त्याची मुलगी त्रिशालाशी खूप कडक वागतो. एवढंच नाही तर त्याच्या मुलीने कोणाशी डेटिंग केलं तर त्यावेळी त्याची भूमिक कशी असेल याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली होती.

संजय दत्त म्हणाला होता की जर त्याची मुले त्याच्याकडे आली आणि त्याला सांगितलं की ते प्रेमात आहेत तर संजय दत्त म्हणाला “जर माझा मुलगा येऊन म्हणाला की तो प्रेमात आहे तर ते ठीक आहे पण जर माझी मुलगी येऊन म्हणाली की ती कोणाच्या प्रेमात आहे किंवा ती कोणाला तरी डेटींग करतेय तर ते देखील ठीक आहे पण मला माहित असायला हवं की तो कोण आहे? आणि काय करते वैगरे”

जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.