Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यापेक्षा बंद करा मालिका’; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ट्विस्टवर भडकले नेटकरी

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळाला. आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे.

'त्यापेक्षा बंद करा मालिका'; 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील ट्विस्टवर भडकले नेटकरी
Sukh Mhanje Nakki Kay Asta actress Girija PrabhuImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 1:47 PM

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळाला. जयदीपने गौरीला (Gauri) कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली आहे. ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. गौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे. आता ही नवीन पाहुणी गौरीच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला पळता भुई थोडं करणार आहे. नव्या गौरीचा लूक आणि मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. मात्र मालिकेच्या कथानकातील या ट्विस्टमुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. अनेकांनी गौरीच्या नव्या लूकला ट्रोल केलं असून काहींनी थेट मालिकाच बंद करण्याची मागणी केली आहे.

नेटकऱ्यांची गौरीच्या या नव्या लूकची तुलना आलिया भटट्च्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील लूकशी केली आहे. ‘गौराबाई काठियावाडी’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे. एकाने मालिकेच्या स्क्रिप्टबाबत मोठी कमेंट केली. ‘हा कार्यक्रम आम्ही खूप दिवसांपासून न चुकता पाहतोय. आवडतोय पण, सध्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट कुठे तरी गडबडली आहे असं वाटत आहे. उगाच काहीपण सुरू केलं आहे. अख्खा इंटरेस्ट निघून गेला आहे’, असं त्यात लिहिलं आहे. ‘एवढी फालतूगिरी एका कुटुंबात होऊ शकते का’, असाही प्रश्न संतप्त नेटकऱ्याने उपस्थित केला आहे. एका युजरने गौरीच्या लूकवरून निर्मात्यांना प्रश्न विचारला आहे. “गौरीचा लूक मालिकेत नेमका किती वेळा बदलणार आहात”, असं त्याने म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव मुख्य भूमिका साकारत आहेत. आपण आई-बाबा होऊ शकणार नाही ही गोष्ट लक्षात येताच जयदीप गौरीने सरोगसीद्वारे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं. यासाठी मानसीने पुढाकारही दाखवला. मात्र मानसीचा खरा डाव गौरीला समजतो. गौरी आई होऊ शकत नाही असे खोटे रिपोर्ट्स मानसीने शालिनीच्या मदतीने तयार केले. गौरीसमोर हे सारं सत्य उघड झालं. शालिनी आणि मानसीचं षडयंत्र गौरी जयदीपला सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्याने मात्र तिचं म्हणणं ऐकून न घेता तिला उंच कड्यावरून ढकलून दिलं आहे.

हेही वाचा :

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

‘अमिताभ बोलतो का रे सेटवर, समोरच्याला घाबरवत असेल ना तो’; किशोर कदम म्हणतात..

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून परीने का घेतला ब्रेक? अखेर कारण आलं समोर

मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.