Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभवी ते नितेश पांडे.. सोशल मीडियावर अखेरची पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावूक!

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील या तीन कलाकारांशिवाय बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचंही गेल्या आठवड्यात निधन झालं. शूटिंगनंतर ती घरी परतत होती. त्यावेळी तिचा अपघात झाला होता.

वैभवी ते नितेश पांडे.. सोशल मीडियावर अखेरची पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल भावूक!
Vaibhavi, Nitesh and AdityaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 2:47 PM

मुंबई : टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी हा आठवडा अत्यंत दु:खद आहे. गेल्या तीन दिवसांत तीन लोकप्रिय कलाकारांनी आपले प्राण गमावले आहेत. आधी 22 मे रोजी अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचं निधन झालं. त्यानंतर 23 मे रोजी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिकेतील अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर आज (24 मे) सकाळी ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडेचं कार्डिॲक अरेस्टने निधन झालं. या तिघांच्या निधनाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्यासाठी भावूक पोस्ट लिहिली आहे, तर काहींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यादरम्यान वैभवी, नितेश आणि आदित्य यांचे सोशल मीडियावर शेवटचे पोस्ट चर्चेत आले आहेत.

नितेश पांडे यांची शेवटची पोस्ट-

नितेश पांडे यांनी फेब्रुवारीमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ते गार्डनमध्ये त्यांच्या पाळीव श्वानासोबत दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळतोय. या व्हिडीओमागे जे गाणं वाजतंय, त्याचे बोल असे आहेत, ‘बिखरने का मुझको शौक है बडा.. समेटेगा मुझे तू बता जरा.’

हे सुद्धा वाचा

वैभवी उपाध्यायची शेवटची पोस्ट-

वैभवीने 6 मे रोजी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये ती हिमाचल प्रदेशच्या निसर्गाचा आनंद लुटताना दिसतेय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘सर्वकाही सोडून द्या आणि फक्त एकदा मोकळा श्वास घ्या.’ वैभवी तिचं आयुष्य अत्यंत खुलेपणानं जगायची, हे तिच्या इतर पोस्टमधूनही पहायला मिळतंय.

आदित्य सिंह राजपूतची पोस्ट-

आदित्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तो आनंदाविषयी बोलताना दिसत आहे. यात तो म्हणतोय की, पैसे गरजेचे असतात पण आनंद हा सर्वांत जास्त गरजेचा असतो. आईच्या हातचं जेवण जेवण्यात आनंद आहे, आपल्या पाळीव प्राण्यासोबत खेळण्यात आनंद आहे, असं तो म्हणतो. रोजच्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधायचा, याबाबत तो व्हिडीओत बोलताना दिसतोय.

हिंदी टेलिव्हिजन विश्वातील या तीन कलाकारांशिवाय बंगाली टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचंही गेल्या आठवड्यात निधन झालं. शूटिंगनंतर ती घरी परतत होती. त्यावेळी तिचा अपघात झाला होता. कोलकातामधील पानीहाटी याठिकाणी सुचंद्रा राहते. शूटिंगनंतर घरी जाण्यासाठी तिने एका ॲपवरून बाईक बुक केली होती. घोषपारा याठिकाणी बारानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिचा अपघात झाला. यावेळी सुचंद्राने हेल्मेट घातला होता. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की तिच्या हेल्मेटचेही तुकडे-तुकडे झाले होते.

मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्...
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्....
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.