‘आत्महत्येचा विचार केला’; विवेक ओबेरॉयने केला धक्कादायक खुलासा

'सुशांतच्या वेदनांना मी समजू शकतो'; जेव्हा विवेक ओबेरॉयनेही सर्वकाही संपवण्याचा केला होता विचार

'आत्महत्येचा विचार केला'; विवेक ओबेरॉयने केला धक्कादायक खुलासा
Vivek OberoiImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 11:54 AM

मुंबई: अभिनेता विवेक ओबेरॉयने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, तेव्हा त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. मात्र काही काळानंतर तो इंडस्ट्रीतून गायब झाला. विवेक ओबेरॉयला अपेक्षित यश मिळालं नाही. ‘साथियाँ’ सारख्या चित्रपटानंतर करिअर उत्तम सुरू असताना काही वादांमुळे तो चर्चेत आला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने त्या काळाचा उल्लेख केला. इतकंच नव्हे तर एकेदिवशी सर्व काही संपवण्याचा निर्णय घेतला होता, असा धक्कादायक खुलासाही त्याने केला.

“माझ्याकडे दीड वर्षे कुठलंच काम नव्हतं. मी चित्रपटांचे ऑडिशन द्यायला जायचो. मात्र सुरेश ओबेरॉय यांचा मुलगा आहे असं कोणालाच सांगत नव्हतो. त्यावेळी मनात अनेकदा वाईट विचार यायचे. एकेदिवशी मी सर्वकाही संपवण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता”, असं विवेक म्हणाला.

“मी माझ्या आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे खूप त्रस्त झालो होतो. कदाचित हाच अजेंडा होता. हा अजेंडा कधी-कधी तुमचं मानसिक खच्चीकरण करतो. सर्वकाही संपवण्याचा अर्थ खूप खोल आहे. मी त्या वेदनांना समजू शकतो, ज्या वेदनेतून सुशांत सिंह राजपूत आणि इतर गेले असतील. माझ्या पत्नीने माझी खूप साथ दिली”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

हे सुद्धा वाचा

करिअरमधल्या त्या कठीण काळाबद्दल विवेक पुढे म्हणाला, “खोटं जेव्हा सतत आणि रेटून बोललं जातं, तेव्हा तुम्हाला ते खरं वाटू लागतं. तुम्ही त्यावर विश्वास ठेवू लागता. मात्र फार काळ सत्याला लपवता येत नाही. माझ्या आईनेही त्या नकारात्मक भावनेतून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली.”

विवेकचा ‘धारावी बँक’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. यामध्ये त्याने सुनील शेट्टीसोबत भूमिका साकारली. बॉलिवूडसोबतच विवेकने ओटीट प्लॅटफॉर्मवरही काम केलंय.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.