Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा मनीषाने ब्रेकअपसाठी ऐश्वर्याला ठरवलं जबाबदार, ढसाढसा रडली अभिनेत्री, किस्सा फार कमी लोकांना माहितीये

Manisha Koirala Blamed Aishwarya Rai: 'त्या' एका पुरुषामुळे ऐश्वर्या राय आणि मनिषा कोईराला यांच्याच झालेले वाद, मनिषाने ऐश्वर्याला ठरवलं जबाबदार ठरवलं तेव्हा.... फार कमी लोकांना माहितीये या प्रेमातं त्रिकूट...

जेव्हा मनीषाने ब्रेकअपसाठी ऐश्वर्याला ठरवलं जबाबदार, ढसाढसा रडली अभिनेत्री, किस्सा फार कमी लोकांना माहितीये
Follow us
| Updated on: Mar 17, 2025 | 3:01 PM

Manisha Koirala Blamed Aishwarya Rai: 90 च्या दशकात बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींमध्ये असलेले वाद समोर आले आहेत. ज्यानंतर अनेक अभिनेत्रींचा एकमेकांसोबत ३६ चा आकडा आहे. एक काळ असा देखील होता जेव्हा अभिनेत्री मनिषा कोईराला हिने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यावर गंभीर आरोप केले होते. ऐश्वर्या राय हिच्यामुळे माझं ब्रेकअप झालं असं… मनिषा म्हणाली होती. रिपोर्टनुसार, ज्या पुरुषासोबत एश्वर्या आणि मनिषा यांच्या नात्याची चर्चा रंगली तो पुरुष दुसरा तिसरा कोणी नाही तर, राजीव मूलचंदानी आहे. राजीव आणि ऐश्वर्या यांच्या नात्याचा खुलासा खुद्द अभिनेत्री मनीषा कोईराला हिने एका मुलाखतीत केला होता.

तेव्हा मनिषा आणि राजीव यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला होता. तर दुसरीकडे ऐश्वर्या हिच्यासोबत देखील राजीव याच्या नावाची चर्चा रंगली. रिपोर्टनुसार, राजीवने ऐश्वर्या राय हिला लिहिलेली प्रेमपत्रे मनीषाच्या हाती लागली. मात्र, एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की, ‘बॉम्बे’ सिनेमा पाहिल्यानंतर ऐश्वर्या फोन किंवा पत्र लिहून मनिषा हिचं कौतुक करणार होती. पण तेव्हाच मनिषा हिने स्वतःच्या ब्रेकअपसाठी ऐश्वर्या हिला जबाबदार ठरवलं होतं.

मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, ‘बॉम्बे’ सिनेमा पाहिल्यानंतर मी मनिषा हिच्या अभिनयाचं कौतुक करणार होती. तेव्हा 1 एप्रिल रोजी राजीव याने मला फोन केला आणि मला सांगितलं आधी न्यूजपेपर वाच… राजीवने मला सांगितलं की मनीषाने दावा केला होता की तिला राजीवने माझ्यासाठी लिहिलेली प्रेमपत्रे मिळाली आहेत. माझा विश्वासच बसत नव्हता! तो खूप मोठा धक्का होता.”

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, राजीव मूलचंदानी याला मनीषा हिने डेट केलं आहे. मनीषा हिने राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याची कबुली देखील दिली आहे. पण ऐश्वर्या हिने कधीही राजीव मूलचंदानी याच्यासोबत असलेल्या नात्याचा स्वीकार केला नाही. यामुळे ऐश्वर्या राय – मनीषा कोईराला वाद देखील झाले होते.

एक काळ असा होता जेव्हा मनिषा कोईराला आणि ऐश्वर्या राय त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. मनिषा हिचं नाव 12 सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्री उद्योजकासोबत लग्न केलं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 2 वर्षानंतर मनिषा हिचा घटस्फोट झाला.

ऐश्वर्या आज अभिषेक बच्चन याच्यासोबत वैवाहित जीवनाचा आनंद घेत असली तरी, अभिनेत्री तिच्या अफेअर्समुळे कायम चर्चत असते. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीने अभिनेता सलमान खान आणि विवेक ओबेरॉय याला देखील डेट केलं आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.