Navratri 2023 : नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत? हे नियम पाळणे आहे आवश्यक

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो.

Navratri 2023 : नवरात्रीत का प्रज्वलित केली जाते अखंड ज्योत?  हे नियम पाळणे आहे आवश्यक
अखंड ज्योत Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 6:16 PM

मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि 9 दिवस अखंड ज्योती पेटवली जाते. नवरात्रीच्या पवित्र 9 दिवसांत अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारी शारदीय नवरात्री 23 ऑक्टोबरला संपणार असून 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. त्याच्या दूसऱ्या दिवशी दुर्गा मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. या वर्षी नवरात्रीच्या काळात  दुर्गा देवीचे हत्तीवर बसून आगमन होत आहे, जे अत्यंत शुभ आहे. चला जाणून घेऊया नवरात्रीत देवीसमोर अखंड ज्योती का लावली जाते.

अखंड ज्योत लावण्यामागचे कारण

नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे. अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विझू न देणे. नवरात्रीमध्ये 9 दिवस सतत 24 तास देवीसमोर दिवा लावला जातो. असे मानले जाते की अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्धी येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते. दिवा विझू नये म्हणून त्यात तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसेच, वाऱ्याने दिवा विझू नये, यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते.

हे सुद्धा वाचा

अखंड ज्योतीचे नियम

  • नवरात्रीत अखंड ज्योती लावत असाल तर काही नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा चुका केल्यास केल्यास देवी नाराज होऊ शकते.
  •  नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे, त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते. अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका.
  • अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका, ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाट वापरा.
  • पाटावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा. जर तुम्ही कलशाच्या वर ज्योत लावत असाल तर खाली गहू ठेवा.
  • अखंड ज्योती दिव्यात पांठऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी.
  • तुपाची अखंड ज्योत असल्यास ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे.
  • अखंड ज्योती वाऱ्याने विझू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे, तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी गणेशाची,  दुर्गा देवीची पूजा करावी. दुर्गा मंत्राचा जप करावा. मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.