AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WHO : प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजी ; काय आहेत ‘डब्लूएचओ’ ची मार्गदर्शक तत्वे

मुलाला जन्म देताना आईला अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. प्रसूतीनंतर महिलांचे शरीर खूपच कमकुवत होते. अशा परिस्थितीत नवजात बाळासोबतच महिलांनाही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ ची म्हणजेच WHO ची प्रसुतिपश्चात काळजी मार्गदर्शक तत्त्वे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

WHO : प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजी ; काय आहेत ‘डब्लूएचओ’ ची मार्गदर्शक तत्वे
प्रसूतीनंतर अशी घ्या ‘आई आणि बाळा’ ची काळजीImage Credit source: Facebook
| Updated on: Apr 13, 2022 | 6:03 PM
Share

मातृत्व ही प्रत्येक स्री साठी नितांत सुंदर अनुभूती असते. पहिल्यांदा बाळाची चाहूल लागले त्या क्षणापासून, स्री च्या शरीरात बदल जाणवू लागतात. शरीरासह ‘मानसीक आरोग्या’ तही (mental health) याकाळात अनेक चढउतार होत असतात. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतरही स्रीयांना अधिकाधिक विश्रांतीची गरज असते. पहिल्यांदाच आई होँणाऱया मातांना बऱ्याच गोष्टी माहित नसतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नवजात बाळाची जबाबदारी. आधीच प्रसूतीमुळे माता थकलेली असते. बाळाच्या उठण्या-झोपण्याच्या वेळा तिला त्रासदायक (Annoying) होतात. त्यात तिला दर दोन-तीन तासांनी स्तनपान करावे लागते. अशा परिस्थितीत आई ची आणि बाळाची योग्य काळजी न घेतल्यास, महिलांना कमी वयातच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे, जर बाळाची योग्य काळजी घेतली नाही तर त्याच्यासाठी देखील सर्व समस्या उद्भवू शकतात. ज्या महिला एकट्या राहतात किंवा पहिल्यांदाच आई होत आहेत, त्यांना याबाबत फारशी माहिती नसते. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत.

मार्गदर्शक तत्त्वे

1. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बाळाच्या जन्मानंतर प्रत्येक आईला स्तनपानाबाबत समुपदेशन केले पाहिजे. यामुळे मनातील सर्व भ्रम दूर होतील आणि स्त्रीला समजेल की उत्तम आहार दिल्याने केवळ बाळाला पोषण मिळत नाही तर आईलाही आरोग्याशी संबंधित सर्व फायदे मिळतात. याशिवाय, जर एखादी महिला पहिल्यांदाच आई झाली असेल, तर तिला समजेल की बाळासाठी आईचे दूध हे मुलासाठी सर्वोत्तम अन्न मानले जाते.

2. मुलाला जन्म दिल्यानंतर किमान 24 तास खूप महत्वाचे असतात. या दरम्यान आई आणि मूल दोघांचीही उच्च दर्जाची काळजी घेतली पाहिजे. नवजात बाळाची योग्य काळजी घेण्यासाठी बाळाच्या पालकांनी मिळून जबाबदारी घेतली पाहिजे.

3. प्रसूतीनंतर महिलांचे शरीर पूर्वीसारखे राहत नाही. ते पूर्वीसारखे बनवायला वेळ लागतो. अशा परिस्थितीत स्त्रिया अनेकदा प्रसूतीनंतरच्या नैराश्याच्या बळी ठरतात. अशा परिस्थितीत महिलांची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. याशिवाय प्रसूतीनंतर तज्ज्ञांच्या सूचनेनुसार महिलेने वेळोवेळी तिची आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे.

4. मुलाला जन्म दिल्यानंतर आईचे शरीर खूपच कमजोर होते. त्याच वेळी, अंगावरील दुध देत असतांना, शरीरावर देखील परिणाम होतो. अशा परिस्थितीत स्त्रीला पोषक तत्वांनी युक्त आहार आवश्यक असतो. या दरम्यान स्त्रीने आपल्या आहारात संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे तसेच प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करावा. गोष्टी खायलाच हव्यात. शरीरात कोणत्याही प्रकारे पाण्याची कमतरता पडू होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे असते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.