AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Refined Oil for Health: रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक, रोज करा केवळ ‘ एवढाच ‘ वापर

तेलाचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नव्हे तर शरीरासाठीही आवश्यक असतो. ब्रेकफास्ट, दुपार व रात्रीच्या जेवणातील पदार्थ हे बहुतांश वेळा तेलाचा वापर करूनच तयार केलेले असतात.

Refined Oil for Health: रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक, रोज करा केवळ ' एवढाच ' वापर
रिफाइंड तेलाचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक
| Edited By: | Updated on: Sep 15, 2022 | 6:10 PM
Share

चाट, भजी, पुरी आणि तळलेले मसालेदार (fried items) पदार्थ खायला खूप चविष्ट लागतात. मात्र त्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब , हृदय आणि यकृताच्या विकारांचा (health problems) धोका वाढतो. एका निश्चित प्रमाणात वापरण्यात आलेले तेल (oil) हे केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर शरीरासाठीही आवश्यक मानले जाते. ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणात खाल्लेले बहुतेक पदार्थ हे तेलाच्या मदतीने तयार केले जातात.

स्वयंपाकाच्या तेलात केवळ आवश्यक पोषक तत्वेच नसतात, तर ते चरबीदेखील (फॅट्स) (fats) मोठ्या प्रमाणात असतात. याच कारणामुळे आहारातील तेलाचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे. विशेषत: जर आपण रिफाईंड तेल वापरत असाल तर त्याच्या प्रमाणात लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. एका दिवसात किती रिफाइन्ड तेल वापरणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, हे जाणून घेऊया .

रिफाइंड तेलाचा किती वापर योग्य ?

निरोगी शरीर हवे असेल तर त्यासाठी तेल खूप महत्वाचे ठरते, त्वचा, केस आणि हाडे निरोगी ठेवण्यास तेल मदत करते. Harjindgi.com च्या नुसार, निरोगी शरीरासाठी एका दिवसात 3 ते 4 चमचे रिफाइंड तेलाचे सेवन करता येऊ शकते.

दिवसाला 20 ग्रॅमपेक्षा जास्त तेल वापरल्यास ते शरीरासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते. आरोग्याची कोणत्याही प्रकारची समस्या किंवा आजार असल्यास तेलाचे प्रमाण कमी करता येते. 2 मोठे चमचे तेलातून आवश्यक पोषक द्रव्ये देखील शरीराला मिळू शकतात.

तेलाचा वापर असा करावा कमी

– तळलेल्या पदार्थांचे सेवन पूर्णपणे बंद करावे.

– एखादी भाजी बनवताना केवळ एक ते दोन चमचे तेल वापरावे.

– भाजलेले किंवा वाफवलेले अन्न पदार्थ खावेत.

– सॅलॅडची चव वाढवण्यासाठी वरतून तेलाचे ड्रेसिंग करू नये.

– पोळी अथवा फुलक्यांवर तूप लावू नये.

– स्वयंपाकासाठी योग्य तेलाची निवड करावी.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.