AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes मध्ये 4 भाज्यांना अजिबात खाऊ नका, Blood sugar वाढण्यास लावतात हातभार

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी डाएटची खास काळजी घ्यायलाच हवी. डाएटमध्ये अशा गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते ज्याच्या आहारातील समावेशाने ब्लड शुगरवर परिणाम होतो.

Diabetes मध्ये 4 भाज्यांना अजिबात खाऊ नका, Blood sugar वाढण्यास लावतात हातभार
diabetesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 9:12 PM

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : डायबिटीज हा आजार हल्ली सर्वत्र पाहायला मिळत आहे. व्यायामाचा अभाव आणि आरामदायी जीवनशैलीमुळे या आजाराची लक्षणे वाढू लागली आहेत. हा आजार पचनक्रियेशी संबंधित असल्याने डायबिटीजमध्ये आहारावर निर्बंध येतात. त्यामुळे कोणते पदार्थ टाळावेत याचे भान असणे गरजेचे असते. शरीरात इन्सुलिनची निर्मिती कमी झाल्याने हा आजार होतो असे ढोबळमानाने मानले जाते. स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती केली जाते. हे एक संप्रेरक आहे जे रक्तातील साखरेचे नियंत्रण करते. जेव्हा शरीर इन्सुलिन तयार करीत नाही तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण धोकादायकरित्या वाढते. तेव्हा आहारात काही पदार्थ टाळायलाच हवेत.

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी डाएटची खास काळजी घ्यायलाच हवी. डाएटमध्ये अशा गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते ज्याच्या आहारातील समावेशाने ब्लड शुगरवर परिणाम होतो. त्यामुळे आपण आहारात जास्त शर्करा असलेले पदार्थ कटाक्षाने टाळत असतो. डायबिटीज तज्ज्ञांच्या मते भाज्या खाणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते. परंतू सर्वच भाज्याकाही डायबिटीजवाल्यांना उपयोगी नाहीत. काही भाज्या खाल्ल्याने आपली शुगर लेव्हल चांगलीच वाढू शकते. त्यामुळे त्यांना आहारातून बाद करणेच उत्तम आहे. चला तर पाहू यात तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे.

रताळे धोकादायक

रताळे आपण उपवासाला उकडून खात असतो. हे कंदमुळ  म्हणजे बटाट्याचे दुसरे रुप आहे. त्याने साखरेचे प्रमाण वेगाने वाढते. रताळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 65 च्या बरोबरीने आहे. यातही कार्बोहायड्रेट असते ज्याने साखरेचे प्रमाण प्रचंड वाढते.

मक्यापासून दूर राहा

मक्याला तर इंग्रजीत स्वीट कॉर्न म्हणतात. त्यामुळे त्याने साखरचे प्रमाण जास्त होते. मक्क्यांचे कणिस आपण आवडीने खातो, परंतू डायबिटीस असलेल्या लोकांसाठी तो धोकादायक आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 आहे. जो मध्यम वर्गवारीचा आहे. परंतू यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण जादा असते. ज्यांना ब्लड शुगर जास्त आहे. त्यांनी मक्का टाळावाच. त्याने शुगरचे प्रमाण वाढते.

भाज्यांचा रसापासून दूर राहा

काही जण भाज्यांचे सूप करून पितात. परंतू तुम्ही गाजराचा ज्युस पित असाल तर तातडीने बंद करा. गाजर गोड असल्याने त्याने साखर वाढते. तसेच ज्युसमध्ये फायबर नसते. त्यामुळे त्याचे सेवन केल्यास तुमचे ब्लड शुगर वाढते.

बटाट्यापासून चारहात दूर राहा

जर तुम्हाला ब्लड शुगर जास्त आहे तर बटाटा सारख्या पिष्ठमय पदार्थ कटाक्षाने टाळायला हवा. बटाटाच्या ग्लायसेमिक इंडेक्स 70 ते 90 दरम्यान आहे, जो खूपच जास्त आहे. यात कार्बोहायड्रेड जास्त असते. ज्यामुळे ब्लड शुगर वाढते. 100 ग्रॅम बटाट्यात 30 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि 2 ग्रॅम फायबर असते. त्यामुळे बटाटा खावू नयेच हेच उत्तम.

'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.