Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वारंवार लागते तहान? आरोग्यासाठी धोक्याची घंटा? तज्ज्ञ काय म्हणतात

दिवसभर पाणी पित राह्ल्याने तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी, शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यासाठी आणि अवयवांना चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी हे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जास्त पाणी पिणे किंवा जास्त तहान लागणे आरोग्यासाठी चांगले नाही.

वारंवार लागते तहान? आरोग्यासाठी धोक्याची घंटा? तज्ज्ञ काय म्हणतात
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 2:10 PM

पाणी प्यायल्यानंतरही तहान भागत नाही का? असू शकते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला पौष्टिक आहाराची जितकी गरज असते, तितकेच दिवसभर भरपूर पाणी पिणेही गरजेचे आहे. आपण नेहमी वाचत असतो किंवा ऐकतो कि कोणताही ऋतू असो, सर्व लोकांनी किमान तीन-चार लिटर पाणी नियमितपणे प्यावे. कारण दिवसभर पाणी पित राह्ल्याने तुमच्या शरीरातील घाण बाहेर काढण्यासाठी, शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राखण्यासाठी आणि अवयवांना चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी हे आवश्यक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की जास्त पाणी पिणे किंवा जास्त तहान लागणे आरोग्यासाठी चांगले नाही.

आरोग्य तज्ञांच्या मते, तुम्ही जर मसालेदार पदार्थ किंवा अधिक ताकद लावून व्यायाम केला की तहान लागणे सामान्य आहे. विशेषत: अधिक तहान आपल्याला उन्हाळाच्या दिवसात लागते. पण कधीकधी आपली तहान इतर वेळेपेक्षा जास्त असू शकते आणि पाणी प्यायल्यानंतरही तहान सतत लागत राहते.अशा प्रकारची परिस्थिती आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही. त्यामुळे जास्त किंवा वारंवार तहान लागणे देखील काही प्रकरणांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते.

वारंवार किंवा जास्त तहान लागण्याच्या अवस्थेला वैद्यकीय भाषेत पॉलीडिप्सिया म्हणतात. जर तुम्हाला सतत तहान लागत असेल, भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला तहान भागत नसेल तर हे काही प्रकारच्या आजारांचे लक्षण असू शकते. मधुमेह किंवा मधुमेह इन्सिपिडस सारख्या समस्यांनी ग्रस्त लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून आली आहे.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला मधुमेह इन्सिपिडस आहे का?

मधुमेह इन्सिपिडसने ग्रस्त लोकांना वारंवार तहान लागण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मधुमेह इन्सिपिडसला मधुमेह मेलिटस म्हणून चुकीचे समजू नये. मधुमेह इन्सिपिडस आपल्या मूत्रपिंडांवर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रंथी आणि संप्रेरकांवर परिणाम करते. यामुळे शरीरात लघवी येण्याचे प्रमाण जास्त होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला जास्त किंवा वारंवार तहान देखील लागू शकते.

पोटॅशियमची कमतरता

हायपोक्लेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आपल्या रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात कमी होत असते, यामुळे हायपोक्लेमिया या आजाराशी ग्रस्त लोकांना जास्त किंवा वारंवार तहान लागण्याची समस्या देखील असू शकते. तसेच उलट्या-अतिसार, काही औषधांचे अतिसेवन यामुळे शरीरातील पोटॅशियमच्या पातळीवर परिणाम होतो. जर ही समस्या दीर्घकाळ कायम राहिली तर तुम्हाला जास्त तहान लागण्याची समस्या उद्भवू शकते.

शरीराच्या लक्षणांकडे लक्ष द्या

तहान ही आपल्या शरीराचा द्रव कमी झाल्याचे सांगण्याचा मार्ग आहे. सामान्य परिस्थितीत पाणी प्यायल्याने तहान भागते. तथापि, जर पाणी पिण्याची इच्छा कायम राहिली किंवा प्यायल्यानंतरही संपत नसेल तर हे आरोग्याच्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, या लक्षणाला दुर्लक्ष न करता लगेच तुमच्या आरोग्य तज्ज्ञांची भेट घ्या.

मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्...
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्....
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.