India-Bangladesh : भारताने शेख हसीनाला आमच्या ताब्यात दिलं नाही, तर…बांग्लादेशकडून धमकीची भाषा

India-Bangladesh : शेजारच्या बांग्लादेशात आरक्षणाच्या मुद्यावरुन मोठ आंदोलन उभं राहिलं. त्यामुळे शेख हसीना यांना बांग्लादेश सोडून पळावं लागलं. सध्या त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. आता बांग्लादेशातून भारताला सूचक शब्दात इशारे दिले जात आहेत.

India-Bangladesh : भारताने शेख हसीनाला आमच्या ताब्यात दिलं नाही, तर...बांग्लादेशकडून धमकीची भाषा
Sheikh Hasina
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 1:00 PM

भारत-बांग्लादेश संबंधात नवीन अध्याय सुरु करण्यासाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं प्रत्यर्पण आवश्यक आहे. हसीना भारतात राहिल्या, तर दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात असा इशारा बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीचे सरचिटणीस मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी दिलाय. BNP सत्तेवर आल्यानंतर अवामी लीग सरकारच्या काळातील वादग्रस्त अदानी वीज कराराची समीक्षा करेल. कारण यामुळे बांग्लादेशच्या लोकांच नुकसान होतय असं बीएनपी सरचिटणीस एका मुलाखतीत म्हणाले.

BNP चे वरिष्ठ नेते आलमगीर यांनी भारतासोबत मजबूत संबंधांची इच्छा व्यक्त केली. आमचा पक्ष मागचे मतभेद विसरुन सहकार्य करण्यास तयार आहे. बांग्लादेशच्या भूमीवरुन भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशा कुठल्याही गोष्टीला आम्ही परवानगी देणार नाही हे सुद्धा आलमगीर यांनी स्पष्ट केलं. अल्पसंख्यांकाची सुरक्षा हा बांग्लादेशचा अंतर्गत विषय असल्याच आलमगीर यांनी सांगितलं. हिंदुंवरील हल्ल्याचे रिपोर्ट चुकीचे असल्याच ते म्हणाले. कारण बहुतांश घटना राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

असं झाल्यास बांग्लादेशातील जनतेच्या भावनाचा सम्मान

शेख हसीना यांचं प्रर्त्यपण भारताने केलं नाही, तर दोन्ही देशातील संबंध बिघडतील असं मिर्जा फखरुल इस्लाम आलमगीर यांचं मत आहे. “भारताने शेख हसीना यांना पुन्हा बांग्लादेशात आणण्याची व्यवस्था केली पाहिजे. असं झाल्यास बांग्लादेशातील जनतेच्या भावनाचा सम्मान होईल” असं आलमगीर यांनी म्हटलं आहे.

….तर, भारताची प्रतिमा आणखी खराब होईल

बांग्लादेश बाबत भारताची कुटनिती योग्य राहिलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. फक्त अवामी लीगच नाही, बांग्लादेशच्या अन्य लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत. बांग्लादेशात बीएनपी सत्तेवर आली, तर भारतासोबत चांगले संबंध आणि मागचे मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करेल असं आलमगीर म्हणाले. शेख हसीना आणि अवामी लीग दोघेही टीकेस पात्र आहेत. त्याचं समर्थन केल्यास भारताची प्रतिमा आणखी खराब होईल असं बीएनपी नेता म्हणाला.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.