AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला माहितीय का? स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात किती मंदिरे पाडली गेली…आता फक्त एवढ्याच मंदिरात केली जाते पूजा!

1947 मध्ये भारत-पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा पाकिस्तानच्या भागात 428 मंदिरे होती. सध्या, भारतातील मंदिरे पाडून त्यांचे अवशेष चर्चेत असल्याच्या बातम्या येत आहेत आणि बरेच लोक पाकिस्तानमध्ये उद्ध्वस्त झालेल्या मंदिराबद्दल बोलत आहेत.

तुम्हाला माहितीय का? स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात किती मंदिरे पाडली गेली...आता फक्त एवढ्याच मंदिरात केली जाते पूजा!
पाकिस्तानात हिंदूंची मंदिरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 6:12 PM

नवी दिल्ली : भारतात सध्या मंदिरांची खूप चर्चा आहे. ज्या ठिकाणी मंदिरे (Temples) पाडण्यात आली आहेत, तेथे पुन्हा मंदिरे बांधावीत, अशी मागणी विशीष्ट वर्गातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत किती मंदिरे तोडली गेली आणि ती तोडल्यानंतर दुसरे मंदिर कुठे आणि कसे बांधले गेले, यावर सातत्याने चर्चा होत असते. त्यामुळे ताजमहाल, कुतुबमिनार या इमारतींबाबत वाद सुरू आहे. इतकंच नाही तर आता पाकिस्तानच्या मंदिराबाबत वाद निर्माण झाला असून पाकिस्तानमध्ये जी मंदिरं पाडण्यात आली, त्या मंदिरांची चर्चा सुरू आहे. वास्तविक, पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनेकदा मंदिर फोडण्याच्या घटना समोर येतात. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरे पाडण्यात आली आहेत, त्यामुळे हिंदू वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात विरोध (Protest) होत आहे.

पाकिस्तानातील मंदिरांची काय अवस्था आहे?

पाकिस्तानमध्ये अनेक वेळा मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर, पाकिस्तानमध्ये धर्मावर आधारित द्वेषाचा उच्चांक आहे, ज्यामुळे आतापर्यंत हजारो मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये एका मंदिराला लक्ष्य करून तोडफोड करण्यात आली होती. त्याच वेळी, जर आपण पाकिस्तानमध्ये नवीन मंदिरांच्या बांधकामाबद्दल बोललो, तर हा आकडा खूपच कमी आहे, अगदी नगण्य आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये अशी काही मंदिरे आहेत, जिथे पूजा केली जात आहे आणि अनेक अहवालांमध्ये मंदिरांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे मानले जात आहे.

मंदिरांनाच लक्ष्य केले गेले

अनेक अहवालांमध्ये मंदिरांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचे मानले जाते. अनेक वेळा मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. भारतात बाबरी पाडल्याच्या वेळीही पाकिस्तानमध्ये 1000 मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. ऑल पाकिस्तान हिंदू राइट्स मूव्हमेंटच्या सर्वेक्षणानुसार, 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा पाकिस्तानच्या भागात 428 मंदिरे होती. परंतु 1990 नंतर यातील 408 मंदिरे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कार्यालये, सरकारी शाळा किंवा मदरशांमध्ये रूपांतरित झाली. या सर्वेक्षणानुसार, अल्पसंख्याकांच्या प्रार्थनास्थळांची १.३५ लाख एकर जमीन सरकारने इव्हॅक्युई प्रॉपर्टी ट्रस्ट बोर्डाला भाडेपट्ट्याने दिली आहे. त्यात हिंदू शीख आणि ख्रिश्चन धार्मिक स्थळांची भूमी होती.

हे सुद्धा वाचा

कुठे आहेत मंदिरे ?

पाकिस्तानमधील काली बारी मंदिर दारा इस्माईल खानने विकत घेतले आणि ताजमहाल हॉटेलमध्ये रूपांतरित केले. पख्तूनख्वाच्या बान जिल्ह्यात एक हिंदू मंदिर होते आणि आता त्यात मिठाई आणि दुकाने उघडली गेली आहेत, असे सांगितले जाते. त्याचवेळी कोहटच्या शिवमंदिरात शाळा सुरू करण्यात आली असून अनेक मंदिरांचे शाळा, हॉटेल आणि दुकानांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे केवळ 20 हिंदू मंदिरांमध्ये पूजा केली जात आहे. अहवालानुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रदेशात सर्वाधिक मंदिरे आहेत, ज्यात 11 मंदिरे आहेत. याशिवाय पंजाबमध्ये चार, बलुचिस्तानमध्ये तीन आणि खैबर पख्तूनख्वामध्ये चार मंदिरे आहेत.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.