52 खोल्या, सोन्याचा रथ, 700 हिरे असलेला मुकुट, नेपाळमधील शाही राजवाड्याविषयी जाणून घ्या
नेपाळचे भारतासोबत भाकरी-मुलीचे नाते आहे. त्या शेजारच्या देशात हल्ली बरीच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा राजेशाहीची मागणी जोर धरू लागली आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत. याविषयी जाणून घेऊया.

नेपाळचे भारतासोबत भाकरी-मुलीचे नाते आहे. त्या शेजारच्या देशात हल्ली बरीच खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा राजेशाहीची मागणी जोर धरू लागली आहे. नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या पुनरागमनाचे संकेत मिळत आहेत. कडक बंदोबस्तात राजा ज्ञानेंद्र त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच राजेशाही समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
‘आम्हाला आमचा राजा परत हवा आहे’, ‘राजेशाही पुनर्स्थापित करा’, ‘राजा आणि देश आमच्या जिवापेक्षा प्रिय आहे’, अशा घोषणा देणारे फलक लोकांनी हातात घेतले होते. नेपाळमध्ये जोर धरू लागलेल्या राजेशाहीचा अत्यंत भयानक अंत झाला. आज आपण नेपाळच्या राजवाड्याबद्दल बोलणार आहोत, जे वर्षानुवर्ष राजघराण्याचे निवासस्थान आहे.
राजघराण्याने ज्या राजवाड्यात 250 वर्ष राज्य केले त्या राजवाड्यातून राजा ज्ञानेंद्र यांची हकालपट्टी करण्यात आली. नेपाळमधील काठमांडू येथील नारायणहिती पॅलेस हा नेपाळमधील एक ऐतिहासिक राजवाडा होता. कित्येकशे वर्ष राजघराण्याने येथे राज्य केले. हा महाल 1963 साली राजा महेंद्र यांच्या आदेशाने बांधण्यात आला होता.
3,83,850 चौरस मीटरमध्ये पसरलेल्या या राजवाड्यात वैविध्य आहे. राजवाड्यात 52 खोल्या आहेत, प्रत्येक खोलीचे वेगळे नाव आहे, जे नेपाळच्या 52 जिल्ह्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. राजवाड्याच्या मुख्य दरवाजाला नेपाळच्या पर्वतांचे नाव देण्यात आले. राजवाड्यात अंगण, बगीचे आणि इमारतींची मालिका आहे. याला नारायणहिती असेही एक विशेष अर्थाने नाव देण्यात आले, ज्याच्या नावाचा अर्थ नारायण (विष्णू) आणि हिती (पाण्याचा प्रवाह किंवा आवाज) असा होतो.
या राजवाड्यात एक सोन्याचा रथ आहे, जो राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी राजा महेंद्र यांना भेट म्हणून दिला होता. 1961 मध्ये ब्रिटनची राणी पहिल्यांदा नेपाळमध्ये आली तेव्हा तिने नेपाळच्या राजाला सोन्याचा रथ भेट म्हणून दिला होता. राजा बीरेंद्र शाह यांच्या राज्याभिषेकावेळी 24 फेब्रुवारी 1975 रोजी या रथाचा प्रथम वापर करण्यात आला.
शाही मुकुट हे नेपाळच्या राजाच्या सामर्थ्याचे आणि एकतेचे प्रतीक आहे. या मुकुटावर 2000 हून अधिक मोत्यांव्यतिरिक्त 730 हिरे जडलेले आहेत. याशिवाय राजवाड्यात सोने-चांदीचे नक्षीकाम, अनमोल झुमटा आहेत.
नेपाळचा हा नारायणहिती राजवाडा आपल्या आलिशान डिझाइनमुळे जितका चर्चेत आहे, तितकाच तो आपल्या दुर्दैवामुळेही चर्चेत राहिला आहे. 1 जून 2001 रोजी या राजवाड्यात नेपाळी शाही नरसंहार झाला. जेव्हा युवराज दीपेंद्र यांनी राजा बीरेंद्र, राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातील नऊ सदस्यांची गोळ्या घालून हत्या केली. राजा, राणी, भावंडांसह 9 जणांची हत्या केल्यानंतर प्रिन्स दीपेंद्रने स्वत:वरही गोळी झाडली. 3 दिवस ते कोमात होते, तेथेही त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना नेपाळचा राजा घोषित करण्यात आले. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चुलत बंधू ज्ञानेंद्र यांना राजा करण्यात आले.
वडिलांचा मारेकरी दीपेंद्रच्या मृत्यूनंतर बिरेंद्रचा धाकटा भाऊ ज्ञानेंद्र नेपाळचा राजा झाला, पण नंतर नेपाळमधील राजेशाही स्थिर होऊ शकली नाही. 2008 मध्ये नेपाळमध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. त्याचवेळी नेपाळच्या राजघराण्याचा राजवाडा नारायणहिती पॅलेसला संग्रहालय बनवण्यात आले.