Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला एकमेव देश जो कधीच कुणाचा गुलाम नाही राहिला, भारताचा आहे शेजारी

आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत जो कधीही कुणाचा गुलाम राहिलेला नाही. जगातील तो एकमेव देश आहे. हा भारताचा शेजारील छोटासा देश कधीच कोणाला शरण देला नाही. या देशावर हल्ले झाले पण कोणालाच त्याला गुलाम करण्यात यश मिळाले नाही. कोणता आहे तो देश जाणून घ्या.

जगातला एकमेव देश जो कधीच कुणाचा गुलाम नाही राहिला, भारताचा आहे शेजारी
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 8:57 PM

जगात असे अनेक देश आहेत जे एकेकाळी कुणाचे तरी गुलाम राहिले आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारताचा शेजारी देश नेपाळ हा इतिहासात कधीही कोणाचा गुलाम झाला नाही. अनेक आक्रमणकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांवर आक्रमण केले, गाव लुटली. भारताचा इतिहास पाहिला तरी हे लक्षात येते की इंग्रजांनी भारतावर दोन शतके राज्य केले. पण तुम्हालाही प्रश्न असा पडला असेल की, नेपाळवर कोणी राज्य का केले नाही?

व्यापाराचे प्रमुख केंद्र

नेपाळ हा तिबेट, भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सर्व व्यापार याच मार्गाने होत होते. त्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की इथपर्यंत पोहोचणे फार कठीण होते. हिमालयातील टेकड्या आणि घनदाट जंगले कोणत्याही आक्रमणकर्त्यासाठी एक मोठा अडथळा होता. तसेच नेपाळी लोक नेहमीच शूर योद्धा राहिले आहेत. गोरखा सैनिकांचे शौर्य जगभर प्रसिद्ध आहे. अनेक युद्धांमध्ये त्यांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. इंग्रजांशी झालेल्या युद्धातही गोरखा सैनिक अतिशय शौर्याने लढले होते.

कोणी-कोणी केले हल्ले

मुस्लीम राज्यकर्त्यांनी अनेकवर नेपाळवर हल्ले केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. शमसुद्दीन इलियास शाह आणि मीर कासिम यांनी नेपाळवर हल्ला केला होता, पण गोरखा सैन्याने त्यांचा पराभव करून त्यांना परत पाठवले होते.

इंग्रजांनी देखील नेपाळवर राज्य करण्याचाही प्रयत्न केला. 1814 ते 1816 या काळात ब्रिटीश आणि नेपाळमध्ये युद्ध झाले, ज्याला गोरखा युद्ध म्हणतात. या युद्धानंतरच सुगौलीचा तह झाला, त्यानुसार नेपाळने कुमाऊं आणि गढवाल भाग इंग्रजांच्या स्वाधीन केले आणि इंग्रजांनी पुन्हा नेपाळवर हल्ला न करण्याचे वचन दिले.

नेपाळचा इतिहास हा त्या देशाचा इतिहास आहे ज्याने आपले स्वातंत्र्य जपले. नेपाळची ही कथा आपल्याला सांगते की कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी तेथील लोकांची एकता आणि शौर्य खूप महत्त्वाचे असते.

'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले
'मी बोललो तर ठाकरेंना देश सोडावं लागेल', रामदास कदम भरसभेत कडाडले.
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल
'...तर धसच जबाबदार', संतोष देशमुख प्रकरणावरून जरांगे पाटलांचा हल्लाबोल.
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?
ठाकरेंच्या या 3 नेत्यांची हाकालपट्टी, शिंदेंचा 'धनुष्यबाण' हाती घेणार?.
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली
'आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी ते वाहून जातील', दानवेंची जीभ घसरली.
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा
'मला हात लावला तर उडी घेईन', 'म्हाडा' मुख्यालयात महिलेने उधळल्या नोटा.
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?
उदय सामंतांचा तो धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, कोणाचा हल्लाबोल?.
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'
भास्कर जाधवांकडून खंत व्यक्त; म्हणाले, 'क्षमतेप्रमाणे मला काम...'.
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?
शनिशिंगणापूरच्या शनिला ब्रँडेड तेलाने अभिषेक, देवस्थानाचा निर्णय काय?.
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे
ममता कुलकर्णींचा यूटर्न, 'किन्नर'च्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा मागे.