Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात कमी अंतर गाठणारी रेल्वे! फक्त 3 किलोमीटर जाण्यासाठी लोकं करतात प्रचंड गर्दी

भारतात देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी लांबलचक रेल्वे प्रवास तसेच छोट्या फेऱ्या आहेत ज्यांना फारसा वेळ लागत नाही.

सर्वात कमी अंतर गाठणारी रेल्वे! फक्त 3 किलोमीटर जाण्यासाठी लोकं करतात प्रचंड गर्दी
Shortest distance train in indiaImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 5:32 PM

नेटवर्कच्या बाबतीत भारतीय रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि सुमारे 2.50 कोटी लोकांची लाइफलाइन म्हणून काम करते. भारतात देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जाण्यासाठी लांबलचक रेल्वे प्रवास तसेच छोट्या फेऱ्या आहेत ज्यांना फारसा वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात कमी आणि सर्वात लांब अंतराच्या रेल्वे प्रवासाबद्दल सांगणार आहोत, जे अतिशय मनोरंजक आहे. होय, आम्ही कोणत्याही मेट्रो किंवा लोकल ट्रेनबद्दल बोलत नाही तर पॅसेंजर ट्रेनबद्दल बोलत आहोत.

ट्रेन कुठून कुठे धावते?

विवेक एक्स्प्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारी दरम्यान एकूण 4286 किमी अंतर पार करते, तर नागपूर ते अजनी हे सर्वात कमी अंतर ३ किमी आहे. महाराष्ट्रात काही गाड्या नागपूर ते अजनी दरम्यान 3 किमीचे अंतर पार करतात. ट्रॅव्हल पोर्टल ‘इक्सिगो’नुसार नागपूर ते अजनी हा प्रवास अवघ्या 9 मिनिटांत पूर्ण होतो. या प्रवासासाठी जनरल क्लाससाठी 60 रुपये आणि स्लीपर क्लाससाठी 175 रुपये मोजावे लागतात.

काही मिनिटांच्या प्रवासासाठी स्लीपर क्लास बुक करण्यात फारसा अर्थ नाही आणि म्हणूनच बहुतेक लोक सामान्य श्रेणीतून प्रवास करतात.

सर्वात लांब ट्रेनचे नाव काय आहे?

विवेक एक्सप्रेस असे देशातील सर्वात लांब मार्गाच्या ट्रेनचे नाव आहे. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त या गाडीची घोषणा करण्यात आली. आसाममधील दिब्रुगड ते तामिळनाडूतील कन्याकुमारीपर्यंत ही गाडी चालते. ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही गाडी सुमारे 4300 किमीचे लांब अंतर पार करते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 150 तासांहून अधिक वेळ लागतो.

या प्रवासादरम्यान ही गाडी 57 स्थानकांवर थांबते आणि एकूण 9 राज्यांमधून जाते. हा मार्ग केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण उपखंडातील सर्वात लांब आहे. हा जगातील 24 वा सर्वात मोठा मार्ग आहे.

वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.