AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका

या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण सर्वात मोठं संकट आहे.

गेल्या 9 वर्षांपासून पावसाचं प्रमाण घटलं, तापमान वाढलं, भविष्यात मोठा धोका
Follow us
| Updated on: Jun 26, 2019 | 8:45 PM

नागपूर : जगभरात पर्यावरण संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जातात, पण भारताच्या बाबतीत विचार केला तर वैयक्तिक पातळीवर त्याबाबत फार जागरुकता दिसून येत नाही. याचाच परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात उष्णता प्रचंड वाढली आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय. यावर्षी चंद्रपुरात सर्वात विक्रमी तापमान नोंदवण्यात आलंय. त्यामुळे तापमान वाढ, बदलतं हवामान आणि सर्वात चिंताजनक म्हणजे कमी झालेलं पावसाचं प्रमाण. या संकटाची चाहूल पाच दशकांपूर्वीच जगाला लागली होती, त्यामुळे 5 जून 1972 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातोय. आज आपल्यासमोर कमी झालेल्या पावसाचं प्रमाण सर्वात मोठं संकट आहे.

जून महिना संपत आलाय, पण पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा मानवी अस्तित्त्वासाठी सर्वात मोठा धोका बनलाय. याचे चटकेही बसायला लागले आहेत. वाढलेल्या तापमानामुळे एकट्या विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यात 50 पेक्षा जास्त लोकांचा उष्माघाताने मृत्यू झालाय, तर सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं जगणंच हिरावून घेतलं जातंय. बदलत्या हवामानामुळे देशात आणि जगातही पावसाने आपला मूड बदललाय. गेल्या काही वर्षांत पाऊस उशिराने येतो आणि लवकर निघून जातोय. पावसाचे एकूण दिवस कमी झालेत. शेतीवर अवलंबून असलेल्या देशातील 57 टक्के जनतेला हा सर्वात मोठा धोका आहे.

हवामान बदलामुळे देशात दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. कधी गारपीट, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. हे बदलतं ऋतूचक्र माणसांपुढे सर्वात मोठं आव्हान आहे.

पावसाचे आकडे, भीषण संकटाची चाहूल

वर्ष – 2012

मराठवाडा- 33 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र – 25 टक्के कमी पाऊस

देशात – 07 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2014

मराठवाडा – 42 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र –  06 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 14 टक्के कमी पाऊस

देशात- 12 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2015

मराठवाडा – 40 टक्के कमी पाऊस

मध्य महाराष्ट्र – 33 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 11 टक्के कमी पाऊस

देशात – 14 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2017

मराठवाडा- 06 टक्के कमी पाऊस

विदर्भ – 23 टक्के कमी पाऊस

देशात – 05 टक्के कमी पाऊस

वर्ष – 2018

मराठवाडा – सरासरीच्या 22 टक्के कमी पाऊस

पाच वर्षातील पावसाचे हे आकडे धोक्याची घंटा आहेत. कारण पाचही वर्षे मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि देशातही सरासरीच्या कमी पाऊस पडला. जगाला ग्लोबल वॉर्मिगचा मोठा धोका आहे, याचे चटके आता सोसावे लागत आहेत. गेल्या काही वर्षांत तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि पावसाचं प्रमाण कमी झालंय.

पावसाचे एकूण दिवसही कमी झाले आहेत. त्याचा मोठा फटका मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यातल्या शेतकऱ्यांना बसतोय. देशात पावसाचं प्रमाण कमी झाल्याची बाब हवामान विभागही मान्य करतो. सततचा दुष्काळ, भूगर्भातील घटलेली पाणीपातळी आणि वाढलेलं तापमान… पर्यावरण बदलाचे हे परिणाम आहेत. त्यामुळे धोका वेळीच लक्षात घेऊन पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि पावसाच्या पाण्याचा काटेकोर वापरही तेवढाच गरजेचा आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.