Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे (Migranant Workers accident at UP).

उत्तर प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, 24 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 9:15 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात मजुरांनी भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे (Migranant Workers accident at UP). एका मालवाहू ट्रकने मजुरांनी भरलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत 23 मजुरांचा जागेवर मृत्यू झाला तर एका मजुराचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या दुर्घटनेत 15 ते 20 मजूर गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Migranant Workers accident at UP).

मजुरांनी भरलेला ट्रक रस्त्यावर उभा होता. मात्र, अचानक एका मालवाहू ट्रकने मजुरांच्या ट्रकला धडक दिली. ही दुर्घटना आज पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत बळी ठरलेले बहुतांश मजूर हे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे आहेत. हे सर्व मजूर राजस्थानवरुन बिहार-झारखंडला जात होते.

या दुर्घटनेवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मजुरांच्या परिवाराप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली आहे. आपण मृतमजुरांच्या परिवारासोबत आहोत, असं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर जखमींवर योग्य उपचार केले जावेत, असे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन दरम्यान घरी परतणाऱ्या देशभरातील कामगारांचे अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये रेल्वेखाली चिरडून 16 मजुरांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना होऊन आठवडाही उलटला नसताना यूपी-एमपीमध्ये घडलेल्या घटनेने देश हादरला. त्यानंतरही अपघाताच्या घटना घडत आहेत.

बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा बसखाली चिरडून मृत्यू

तीन दिवसांपूर्वी बिहारला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांचा उत्तर प्रदेशमध्ये बसखाली चिरडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन चालणार्‍या सहा मजुरांना भरधाव बसने चिरडले. घळौली चेकपोस्टजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला. या प्रकरणी अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी, तर यूपीत सहा मजुरांना बसने चिरडले

महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेले आठ मजूर अपघातात बळी

याशिवाय 14 मे रोजी महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला निघालेल्या मजुरांच्या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला, तर 50 हून अधिक मजूर जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला होता.

हेही वाचा : Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये गेल्या शुक्रवारी घडली. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. जालन्यातील स्टील कंपनीत काम करणारे मजूर मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी होते.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.