AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं.

दुष्काळमुक्तीचा ‘पंकजा’ पॅटर्न, जायकवाडीतील पाण्याने बीड व्यापणार
Follow us
| Updated on: Aug 17, 2019 | 4:22 PM

मुंबई : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठीच्या उपाययोजनांचं निवेदन सादर केलं. मराठवाड्यातील नेहमीच्या दुष्काळावर मात करण्यासाठी जायकवाडी प्रकल्पात उपलब्ध होणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी, समांतर प्रवाही कालव्याद्वारे माजलगाव धरणात आणून, त्याद्वारे सिंदफना, कुंडलिका, वाण, मनार आणि मांजरा उपखोऱ्यात वळविणेबाबतचे निवदेन पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

कशी असेल प्रस्तावित योजना?

भाग 1- जायकवाडी धरण ते सिंदफना नदी यांना जोडणारा जलदगती प्रवाही कलवा 70 किमी काढणे.

भाग 2- मांजरा, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मासोळी, व मनार प्रकल्पाचे  स्थैर्यकरण करणेसाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी उपखोऱ्यात वळविणे.

मराठवाडयातील बीड, केज, धारूर, वडवणी, शिरूर, पाटोदा, माजलगाव, अंबाजोगाई, परळी, अहमदपूर, कंधार, रेणापूर, चाकूर, बिलोली आणि मुखेड तालुक्यात नवीन सिंचन योजना हाती घेता येतील.

प्रस्तावित योजनेसाठी अंदाजे 6700 कोटी खर्च अपेक्षित असून, या योजनेचे सर्वेक्षण तात्काळ करण्याची मागणी  पंकजा मुंडेंनी केली.

जायकवाडी धरण भरलं

आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. उत्तर महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरण भरलं. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.

जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धा फुटाने उचलून तब्बल 5700 क्युसेक्सने हा पाण्याचा विसर्ग करणयात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धारणाखाली असलेल्या नदी काठावरील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

संबंधित बातम्या 

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग, ड्रोनच्या माध्यमातून पाहा विहंगम दृश्य 

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडलं, अत्यल्प पावसाने अनेक गावात अजूनही टँकरने पाणी 

नाथसागर शंभरीकडे, प्रत्येक मराठवाडावासियाचं मन सुखावणारे फोटो 

अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.