Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायण’चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले…

'रामायण' मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Fake accounts on social media) आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी सध्या सोशल मीडियावरील फेक अकाउंटमुळे त्रस्त झाले आहेत.

'रामायण'चे राम आणि लक्ष्मण फेक अकाउंटने त्रस्त, म्हणाले...
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 9:38 PM

मुंबई : ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल (Fake accounts on social media) आणि लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लहरी सध्या सोशल मीडियावरील फेक अकाउंटमुळे त्रस्त झाले आहेत. ‘दूरदर्शन’वर ‘रामायण’ मालिका सुरु झाल्यापासून सोशल मीडियावर त्यांच्या नावाचे अनेक फेक अकाउंट असल्याचं समोर आलं आहे. याबाबत दोघांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण दिलं आहे (Fake accounts on social media).

अरुण गोविल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करुन याबाबत खुलासा केला आहे. “ट्विटरवर कुणीतरी ‘रिअल अरुन गोविल’ नावानं अकाउंट बनवलं आहे. मात्र, ते खोटं आहे”, असं अरुन गोविल यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सुनील लहरी यांनीदेखील ट्विट करत माहिती दिली.

“कुठल्यातरी चुकीच्या आणि खोट्या ट्विटर अकाउंटर माझे 3 ते 4 वर्षांपूर्वीचे फोटो शेअर केले जात आहेत. माझ्या नावाने अनेक खोटे ट्विटर आणि फेसबुक अकाउंट सुरु आहेत”, असं सुनील लहरी यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना विषाणूंपासून देशाला वाचवण्यासाठी सरकारने देशभरात मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. मात्र इतके दिवस घरात राहून वेळ घालवणे कठीण होतं. त्यामुळे लॉकडाऊनला यशस्वी बनवण्यासाठी सरकारने लोकांच्या आग्रहास्तव ‘रामायण’ ही मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात केली. दिवसाला दोन वेळा ‘दूरदर्शन’ या चॅनेलवर ही मालिका दाखवली जाते.

या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या आग्रहास्तव ही ‘रामायण’ मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ही मालिका सुरु झाल्यापासून पुन्हा एकदा या मालिकेने दाखवून दिले आहे ही आजही ही मालिका टीआरपीच्या बाबतीत सर्वोकृष्ट आहे. आजही या मालिकेच्या तोडीस दपसरी कुठलीही मालिका नाही. इतकंच नाही तर 2015 पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे.

सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा प्रसारित कराव्या, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यानंतर या मालिका टीव्हीवर पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आल्या. या मालिका बघून लोकांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातमी : Ramayan : रामायण मालिकेने टीआरपीचं गणित बदललं, पुन्हा एकदा इतिहास रचला

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.