Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार घडेल; मराठा आरक्षणावरून कुणी दिला सरकारला मोठा इशारा

मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. मराठा आरक्षणावर तोडा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार उडेल असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील जिथे आहेत तिथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.

तोडगा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार घडेल; मराठा आरक्षणावरून कुणी दिला सरकारला मोठा इशारा
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 12:31 PM

मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य ढवळून काढणारे मनोज जरांगे पाटील आता मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. आझाद मैदानात येऊन ते आंदोलनाला बसणार आहेत. ते मुंबईत येऊ नयेत यासाठी सरकारच्या शिष्टमंडळाने काल लोणावळ्यात त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आज नवी मुंबईतही त्यांच्याशी चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकाराल मोठा इशारा दिला आहे. मराठा आरक्षणावर तोडा काढला नाही तर महाराष्ट्रात हाहा:कार उडेल असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील जिथे आहेत तिथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असंही त्यांनी सुनावलं.

शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . तेव्हा त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. या मुद्यावर तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल. मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे. हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे, असे ते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री शेतावर काहीतरी उपटत होते काय उपटत होते माहित नाही, त्यांनी ही उपटा उपटी थांबवावी आणि राज्यात लक्ष घालावे असा टोलाही त्यांनी लगावला.

या देशात संविधान राहिलेलं नाही

गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायलय आणी निवडणूक आयोग काम करत आहेत. आमचा विरोध हा हुकूमशाहीला आहे. संविधान नाहीं हम करे सो कायदा असा खाक्या आहे. संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करीत आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.