AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे समुद्रातील प्रदुषणात घट, पालघर समुद्रात माशांचा वावर

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Sea pollution decrease due to lockdown) आहे.

लॉकडाऊनमुळे समुद्रातील प्रदुषणात घट, पालघर समुद्रात माशांचा वावर
Follow us
| Updated on: Apr 17, 2020 | 5:18 PM

पालघर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Sea pollution decrease due to lockdown) आहे. या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक सेवा सोडल्या तर इतर सर्व बंद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केली होती. या लॉकडाऊनमुळे समुद्रातील प्रदूषणात घट झाल्याचे समोर (Sea pollution decrease due to lockdown) आलं आहे.

पालघर येथे आशिया खंडातील सर्वात मोठे बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्र आहे. यामध्ये साडे बाराशेपेक्षा जास्त लहान मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच शेजारील समुद्रात सोडलं जात होतं. त्यामुळे येथील खाडी किनारी मिळणारे मासे नाहीसे झाले होते. परिणामी येथील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने बंद असल्यामुळे येथील सांडपाणी समुद्रात सोडले जात नसल्याने समुद्र स्वच्छ दिसू लागले आहेत.

समुद्रातील प्रदुषण घटल्यामुळे येथे माशांचा वावरही वाढला आहे. त्यामुळे 12 ते 13 वर्षानंतर समुद्रात पुन्हा रोजगार मिळण्याची आशा या मच्छीमारांना दिसू लागली आहे. सरकार आणि शासनाने ही परिस्थिती बघून लॉकडाऊननंतर या औद्योगिक क्षेत्रात सुरू होणाऱ्या कारखान्यांना योग्य समज आणि आदेश द्यावे जेणेकरून हे समुद्र किनारे असेच स्वच्छ दिसतील अशी मागणी येथील स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे देशात सर्व गोष्टी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्र, वायू प्रदुषणात घट झाल्याचेही समोर आले आहे. भरातात पहिल्यांदाच दिल्ली आणि मुंबईसारख्या परिसरातील वायू प्रदुषणात घट झाली आहे.

राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.