AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क

वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. (Wardha organic mask demand in England)

वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये मागणी, साहेबांच्या तोंडावर सेंद्रिय कापसाचे मास्क
Wardha organic mask demand in England
Follow us
| Updated on: Aug 06, 2020 | 2:36 PM

वर्धा : स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्वाचे शस्त्र ठरलेल्या महात्मा गांधी यांच्या खादीचे आज महत्व वाढले आहे. खादी कापड वस्त्र म्हणून तर साता समुद्रापलीकडे पोहचले होते. पण आता हीच खादी मास्कच्या रुपात इंगलडमध्ये पोहचली. कोरोनाच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडणारी खादी इंग्लंडमध्ये पसंतीला उतरली आहे. वर्ध्याच्या ऑरगॅनिक कापसापासून तयार केलेले खादीचे मास्क इंग्लंडच्या बाजारात मागवले जात आहेत. एवढेच नाही तर शिस्तीत मास्क बांधणाऱ्या ब्रिटिशांना आता हा मास्क संरक्षक ठरत आहे. (Wardha organic mask demand in England)

मार्च महिन्यात भारतात झालेला कोरोनाचा शिरकाव आणि लगेच वाढलेली धावपळ सर्वांनाच भयभीत करणारी होती. लॉकडाऊन लागताच मास्कचे महत्त्वही वाढले. पण निर्यातीवर बंदी असल्याने मास्क बाहेर देशात जात नव्हते. बंदी उठली आणि वर्धा जिल्ह्यात तयार होणारे खादी मास्क भारतासह इंग्लडमध्येदेखील पोहचले.

आता गोपुरीच्या ग्राम सेवा मंडळाने एक पाऊल आणखी पुढे जात, अस्सल सेंद्रिय कपाशीच्या कापडापासून मास्क बनवायला सुरुवात केली. इंग्लंडमधील खादीमध्ये कार्यरत मित्रांना हे मास्क पाठविण्यात आले. तेथे त्यांनी ते विक्रीला ठेवले. इंग्लंडमध्ये हे सेंद्रिय मास्क ग्राहकांच्या चांगलेच पसंतीला पडले.

ऑरगॅनिक कापसापासून निर्मित खादीचे तयार केलेले मास्क इंग्लंडच्या बाजारात जाऊ लागले आहेत. सातासमुद्रापार पोहोचलेल्या या सेंद्रिय मास्कने विदेशातही खादीचे गुणगाण गायले आहेत. 1934 मध्ये आचार्य विनोबा भावे यांनी ग्रामसेवा मंडळाची स्थापना केली होती. इथं कापसापासून कापड निर्मितीची प्रक्रिया केली जाते. त्याकरिता तेथूनच त्याचं डिझाईन, लांबी, रुंदी, शिलाईची पद्धतही सांगितली.

जवळपास एक महिना त्यावर बारीक काम केल्यावर मास्क पाठवण्यात आले आहेत. हे मास्क पसंतीला उतरत असून ग्रामसेवा मंडळाला एक हजार मास्कची ऑर्डर मिळाली आहे. हे मास्क श्वसनाला चांगले असून घाम आला तरी त्रास होत नाही. निर्जंतुकीकरण करता येते. गरम पाण्यातही धुवून वापरता येतात. लवकरच नवीन ऑर्डर मिळतील, असा विश्वास ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे यांनी व्यक्त केला आहे.

हा मास्क दिलेल्या मापातच तंतोतंत शिवावा लागतो. थ्री लेअर मास्क धुवून वापरता येतो. एक मास्क शिवायला जवळपास 20 ते 30 मिनिटे लागतात. रोजगार गमावलेल्या काळात खादीने रोजगार मिळवून देण्यासाठी हातभार लावला आहे. ग्रामीण भागात आता खादी मोठे रोजगाराचे साधन बनले आहे.

कोरोनापासून संरक्षण आणि हाताला काम अशी दुहेरी भूमिका पार पाडणाऱ्या खादीने मास्कच्या रुपात कोरोनाच्या लढ्यात आपले योगदान दिले आहे.

(Wardha organic mask demand in England)

संबंधित बातम्या 

Buldhana Gold Mask | बुलडाण्यात तब्बल साडे सहा तोळ्याचा सोन्याचा मास्क 

घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार
घोडा आणि खेचर पुरवणाऱ्यांचेही जबाब नोंदवणार.
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?
पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई, आता भारतात टिव-टिव बंद, कारण नेमकं काय?.
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश
देशातील काही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचे केंद्राचे आदेश.
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल
Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रसंघात भारतानं केली पाकिस्तानची पोलखोल.
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती
भारतीय फोन नंबर वापरून आयएसआय काढतंय लष्कराची माहिती.
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.