अंजीर खाण्याचे फायदे मोठे, जाणून घ्या अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?

अंजीर हे उन्हाळ्यात पोटासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर भिजवल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण जाणून घेणार आहोत की अंजीर भिजवून का खावे आणि उरलेले पाणी आपण पिऊ शकतो का?

अंजीर खाण्याचे फायदे मोठे, जाणून घ्या अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 10:28 PM

अंजीर हे सुपरफूड मानले जाते. तुम्ही फळ आणि ड्राय फ्रूट म्हणून अंजीर नक्कीच खाऊ शकता. पण वाळलेले अंजीर लवकर खराब होत नाहीत. अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अंजीर हे नेहमीच पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता दूर होते आणि पोटासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते. तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही भिजवलेले अंजीर नक्की खालले पाहिजे. 1-2 अंजीर दररोज पाण्यात भिजवून सकाळी खावेत. मात्र, अंजीर भिजवलेले पाणी प्यावे की फेकून द्यावे हे काही लोकांना माहित नाही.

भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे?

  • भिजवलेले अंजीर खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पोट साफ होते.
  • फायबरमध्ये भरपूर आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने अंजीर रक्तातील साखर नियंत्रित करते.
  • मधुमेह कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर खावे.
  • दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  • पीएमएस आणि पीसीओडी रुग्णांसाठीही अंजीर खूप फायदेशीर ठरते.
  • गर्भवती मातांसाठीही अंजीर फायदेशीर मानले जाते.
  • अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

आपण अंजीर भिजवलेले पाणी पिऊ शकतो का?

तुम्ही 2-3 अंजीर घेऊन ते ते रात्रभर 1 ग्लास पाण्यात भिजवावे. रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर सकाळी प्रथम ते अंजीर खावून घ्या. यानंतर अंजीर भिजवलेले पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळेल.

अंजीरमध्ये भरपूर फायबर असते. त्यामुळे पचनाची समस्या दूर होते. अंजीर हे कमी उष्मांक असलेले अन्न आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात. अंजीर खाल्ल्याने शरीराला कॅरोटीन, ल्युटीन, टॅनिन आणि क्लोरोजेनिक ॲसिड मिळते. अंजीराचे सेवन फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करते. मधुमेही रुग्णही अंजीर खाऊ शकतात. जर तुम्ही फळ म्हणून ताजे अंजीर खाल्ले तर ते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, पॅन्टोथेनिक ॲसिड, पायरीडॉक्सिन, नियासिन आणि फोलेट्स पुरवतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.