Evening Workout : संध्याकाळी व्यायाम करायला हवा की नको?

Evening Workout : आजच्या धवपळीच्या विश्वात सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असते, त्यामुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही. अशा स्थितीत संध्याकाळी व्यायाम करून तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकता. याच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.

Evening Workout : संध्याकाळी व्यायाम करायला हवा की नको?
Follow us
| Updated on: Jun 03, 2024 | 2:58 PM

आजच्या धावपळीच्या विश्वात, बदलद्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. 8 ते 9 तास काम बसून असेल तर, वजन देखील झपाट्याने वाढतं. शिवाय शारीरिक समस्या देखील डोकंवर काढतात. अशात शरीराला व्यायामाची नितांत गरज असते. यामुळे वजन तर नियंत्रणात राहतेच, पण आजारांचा धोकाही कमी होतो. व्यायाम केल्याने आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्तम राहातो.

पण सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना वर्कआउटसाठी वेळ काढणे थोडे कठीण झाले आहे. काही लोकांचं असं माननं आहे की, फक्त सकाळी व्यायाम केल्याने शारीराला फायगा हतो. पण असं काहीही नाही. संध्याकाळी देखील व्यायाम केल्याने फायदे मिळतात.

संध्याकाळी व्यायाम करणे हा एक चांगला पर्याय आहे. संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे व्यायाम करण्यासाठी वेळ देखील अधिक मिळते. दिवसभराचं काम संपवून तुम्ही संध्याकाळी निवांत व्यायाम करू शकता. सतत विचार करत व्यायाम केल्याने त्याचा काहीही फायदा होत नाही.

हे सुद्धा वाचा

जेव्हा तुम्ही सकाळी व्यायाम करता तेव्हा तुमच्या शरीराला वॉर्म अप करण्याची गरज असते. कारण झोपेतून उठल्यानंतर शरीरातील संपूर्ण ऊर्जा पातळी कमी होते. पण जर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करत असाल तर तुम्हाला वॉर्म अप करण्याची गरज नसते. संध्याकाळी तुम्ही अधिक चांगला व्यायाम करु शकता.

व्यायाम केल्यामुळे तणाव दूर होतो. तणाव दूर करण्यासाठी व्यायाम एक उत्तम पर्याय आहे. आजचं धकाधकीचं जिवन आणि जीवनशैलीत तणावाचे बळी आहेत. संध्याकाळी व्यायाम केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर राहतो. व्यायामामुळे स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात. यामुळे तुम्हाला अधिक आराम वाटतो.

रोजच्या कामाने रात्री चांगली झोप लागत नाही. अशात संध्याकाळी व्यायाम केल्याने तणाव दूर होतो आणि रात्री शांत झोप लागते. संध्याकाळी व्यायाम केल्यास स्नायू शिथिल राहतात.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.