Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करायचे आहे? मग जेवल्यानंतर 45 मिनिटे पाणी पिणे टाळाच!

वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि व्यायाम करण्यात येतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी देखील राहतात. तरीही वजन कमी होत नसल्यामुळे अनेकजण आैषध उपचार देखील घेतात.

वजन कमी करायचे आहे? मग जेवल्यानंतर 45 मिनिटे पाणी पिणे टाळाच!
पाणी
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 10:05 AM

मुंबई : वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट आणि व्यायाम करण्यात येतात. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी दिवसभर उपाशी देखील राहतात. तरीही वजन कमी होत नसल्यामुळे अनेकजण आैषध उपचार देखील घेतात. मात्र, हे सर्व करूनही वजन कमी होत नसल्याचे आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. मात्र, वजन झटपट कमी करण्यासाठी आम्ही एक टिप्स सांगत आहोत. (To live a healthy life, do not drink water for 45 minutes after a meal)

ते तुम्ही फाॅलो केले तर आपले वजन झटपट कमी होण्यास नक्की मदत होईल. आपल्या सर्वांना माहीती आहे की, पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर आपण जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा. जेवल्यानंतर पाणी पिल्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते आणि अन्न पचन होत नाही. ज्यामुळे लठ्ठपणा वाढण्यास सुरूवात होते. तसेच पचनाच्या इतर समस्या उद्भवतात.

जेवणाच्या 45 मिनिटे आधी आणि जेवण झाल्यानंतर 45 मिनिटांनंतर पाणी पिणे टाळा. जर आपण हे फाॅलो केले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. पाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेली जादा चरबी कमी होते. ज्यामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो. परंतु जर आपण दररोज जास्त पाणी पित असाल तर मूत्रपिंडा संदर्भातील अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. परंतु, जेवण खाण्यापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते.

वास्तविक, खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे जठरासंबंधी रस पाचन तंत्रामधून सोडलेल्या पाचन एंजाइममध्ये विरघळून जातात. ज्यामुळे शरीराला अन्नामधून पुरेसे पोषकद्रव्य मिळत नाही. याशिवाय गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटीसारख्या समस्या होण्याचीही शक्यता निर्माण होते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तप्नाम कमी असू नये. उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(To live a healthy life, do not drink water for 45 minutes after a meal)

'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.