Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर काय खावे माहितीये पण वाढल्यानंतर काय करावे?

Health Tips : व्हिटॅमिन बी 12 कमी झाले असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणं महत्त्वाचं असतं. पण जर ते जास्त झालं तरी देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचू शकते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 घेण्याचे तोटे आहेत.

शरीरात व्हिटॅमिन B12 कमी झाल्यावर काय खावे माहितीये पण वाढल्यानंतर काय करावे?
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 7:41 PM

Vitamin B 12 : व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. या जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर शरीरात अनेक गंभीर आजार उद्भवतात. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता सुरू झाल्यास बहुतेक लोक फूड सप्लिमेंट्स घेतात. पण जर कोणत्याही शरीरात व्हिटॅमिन बी 12 जास्त झाले तर मात्र काय करावे हे अनेकांना माहित नसेल. हो व्हिटॅमिन बी12 जास्त झाले तरी ते शरीरासाठी चांगले नसते.

जर बी 12 जीवनसत्व शरीरात जास्त झाले तर तुम्हाला मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी या सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अतिसार, थकवा आणि अशक्तपणा येतो. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त असल्यास त्वचेवर लाल पुरळ देखील येतात.

व्हिटॅमिन बी 12 वाढल्यास घाबरू नका

व्हिटॅमिन बी 12 शरीरात खूप प्रमाणात वाढले तर घाबरून जाऊ नका. व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. जे किडनी आणि लघवीद्वारे बाहेर जाते. 2 ते 4 आठवड्यांत त्याचे परिणाम दिसू लागतात.

कोणत्या गोष्टी खाऊ नये

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 जास्त झाले तर आठवडा तुम्ही काही गोष्टींचे सेवन टाळले पाहिजे. व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण जास्त असेल तर चिकन, मासे आणि सॅल्मन फिश तसेच दूध, दही आणि दुग्धजन्य पदार्थ अजिबात खाऊ नयेत. कारण शरीरात जास्त B12 असल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. काही लोकांच्या ऑप्टिक मज्जातंतूला देखील नुकसान होऊ शकते. तर मुलांमध्ये अंधत्वाची समस्या येऊ शकते.

व्हिटॅमिन बी 12 घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे?

डॉक्टरांच्या माहितीनुसार, व्हिटॅमिन बी 12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. B1, B2, B6 आणि B9 हे देखील पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे आहेत. व्हिटॅमिन सी देखील असेच काम करते. ही सर्व जीवनसत्त्वे रिकाम्या पोटी जास्त शोषली जातात. त्यामुळे नाश्त्याच्या 1 तास आधी किंवा 1 तासानंतर ते घेणे अधिक चांगले असते. यामुळे शरीराला जास्तीत जास्त जीवनसत्त्वे मिळतात. आरोग्य तज्ञांच्या मते, व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी घेण्याची एक विशेष वेळ आहे. दिवसाच्या एकाच वेळी त्यांचे सेवन केल्यास शरीराला त्यांचा अधिक फायदा होऊ शकतो.

अस्वीकरण: बातम्यांमध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी, संबंधित तज्ञाचा सल्ला घेतला गेला पाहिजे.

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.