AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 450 कर्मचारी आमरण उपोषण करणार, पालिकेच्या समोर सुरू असलेलं आंदोलन मनसेच्या नेतृत्वात

नाशिक महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेच्या नेतृत्वात वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यावरून नाशिक शहरातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

तब्बल 450 कर्मचारी आमरण उपोषण करणार, पालिकेच्या समोर सुरू असलेलं आंदोलन मनसेच्या नेतृत्वात
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 12:02 PM

नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या ( NMC ) माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून वॉटरग्रेस कंपनी स्वच्छतेचे काम करत आहे. शेकडो कर्मचारी नाशिक शहराची स्वच्छता वॉटरग्रेस ( Watergrace ) कंपनीच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र, वॉटरग्रेस कंपनी आणि कर्मचारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला होता. त्यात मनसेच्या नेत्यांनी ( MNS Leader ) उडी घेतली होती. आता मात्र हा वाद अधिकच चिघळला असून 450 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने आमरण उपोषण सुरू केले आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर वॉटरग्रेस कंपनीच्या 350 कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

वॉटरग्रेस कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यानंतर वॉटरग्रेस कंपनीचे कर्मचारी अधिकच आक्रमक झाले आहे. पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे यासाठी कर्मचारी यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहेत.

हे सुद्धा वाचा

नाशिक महानगर पालिकेच्या राजीव गांधी भवन येथील प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महानगर पालिकेने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

यापूर्वीही वॉटरग्रेस कंपनीवर कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच हा वाद मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. नाशिक शहरात या आंदोलनामुळे अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महानगर पालिकेचे कंत्राटदार असलेल्या वॉटरग्रेस कंपनीच्या संदर्भात आमरण उपोषण कर्मचारी करू लागल्याने नाशिकच्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे हे आंदोलन मनसेच्या नेतृत्वात होत आहे.

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा मनसेने हाती घेतला आहे. आमरण उपोषण करत आंदोलन सुरू झाले असले तरी येत्या काळात काय घडामोडी घडतात, पालिका याबाबत दखल घेते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वॉटरग्रेस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव नाशिकमध्ये आले होते. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना मनसे तुमच्या पाठीशी असून येत्या काळात तुम्हाला अडचण आल्यास हाक मारा असे आवाहन करत मनसे पाठीशी राहील अशी भूमिका मांडली होती.

त्यानंतर सफाई कर्मचारी असलेल्या जवळपास 450 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरुन सफाई कर्मचारी यांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले त्यामध्ये मनसेने नेतृत्व करत भूमिका घेतली आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.