Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला ‘या’ जिल्ह्यातही मोठा धक्का; माजी आमदाराचे या कारणामुळे संचालकपद गेले

लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी लेखी आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाटील यांना पुढील 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाकरे गटाला 'या' जिल्ह्यातही मोठा धक्का; माजी आमदाराचे या कारणामुळे संचालकपद गेले
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 10:58 PM

उस्मानाबादः राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला वेगवेगळे राजकीय धक्के बसत आहेत. एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील वेगवेगळ्या स्थानिक संस्थांमध्येही धक्के बसत आहे. असाच प्रकार उस्मानाबाद येथे उद्धव ठाकरे गटाला उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा धक्का बसला आहे.

भूम परंडा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे संचालक पद अपात्र ठरविण्यात आले आहे.

त्यांना 2 पेक्षा जास्त आपत्य असल्याचे कारण देत ज्ञानेश्वर पाटील यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पद गेले आहे. माजी आमदार पाटील यांचे भूम परंडा मतदार संघात प्राबल्य असून ते एकेकाळी मंत्री सावंत यांचे निकटवर्तीयही समजले जात होते.

तर दुसरीकडे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत याचे पुतणे तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या तक्रारीनंतर ही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी लेखी आदेश देत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पाटील यांना पुढील 5 वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नसल्याचेही त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे.

माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी संचालक पदाच्या निवडणुकीत त्यांनी 2 पेक्षा जास्त असलेली इतर अपत्य नमूद केली नाहीत अशी तक्रार धनंजय सावंत यांनी केली होती.

त्या प्रकरणावरूनच हा वाद पेटला होता. ज्ञानेश्वर पाटील यांचा पहिला विवाह हा सिंधू यांच्यासोबत झाला होता मात्र त्यांचे निधन झाले. सिंधू यांच्यापासून पाटील यांना पहिले अपत्य 7 मार्च 1993 रोजी झाले होतेत तर दुसरे आपत्य 12 ऑगस्ट 1995 रोजी झाले होते.

त्यानंतर पाटील यांनी राणी उर्फ उषा यांच्याशी विवाह केला होता. त्यांच्यापासून त्यांना 2 आपत्य झाली होती. त्यातील पहिले अपत्य हे 15 सप्टेंबर 2006 व दुसरे 15 ऑक्टोबर 2008 रोजी झाले होते.

या चारही अपत्य यांच्या नोंदी नगर परिषद बार्शी येथे करण्यात आलेली आहे. ज्ञानेश्वर पाटील हे यापूर्वी 2009 मध्ये जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आले होते.

मात्र त्यांना 2001 नंतरचे 2 अपत्य असल्याने संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली.

पाटील यांनी प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी अपत्यांची माहिती लपवली होती.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.